शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना काळात सातत्याने होत असलेल्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, तीन दिवसांपासून या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोना काळात सातत्याने होत असलेल्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, तीन दिवसांपासून या भाववाढीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. शेंगदाणा आणि सोयाबीन तेलाच्या दरात घसरण दिसून आली आहे. शेंगदाणा तेलाचे भाव प्रतिकिलो ५, तर सोयाबीन तेल ३५ रुपयांनी घसरले. भाव कमी झाल्याने गृहिणींना काहीअंशी का असेना पण दिलासा मिळाला.

मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच स्तरांतील नागरिकांवर परिणाम झाला. आता कोरोनाच्या महामारीत महागाईचा मार बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती, आयात करावर दोन्ही देशांनी लावलेले आयात-निर्यात शुल्क, परदेशांत कमी झालेले उत्पन्न, कामगारांचे प्रश्न, कोरोनाचे संकट यामुळे सर्वाधिक आयात या विविध कारणांमुळे तेलाच्या किमती वाढल्या. किरकोळ बाजारात या किमतीत २० टक्क्यांनी आणखी वाढ झाली. त्यामुळे तेल २०० रुपये किलोपर्यंत विकले गेले. आता हळूहळू हे भाव नियंत्रणात येण्याचे संकेत बाजारपेठेतून मिळाले आहेत. तेलाचे भाव तीन दिवसांत ५ ते ३५ रुपयांनी घसरण्याचे मुख्य कारण हे कमोडिटी बाजारात झालेली घसरण व तेलबिया आयातीचा घेतलेला निर्णय आहे.

आधीच्या काळात शेतात सोयाबीन, करडई, शेंगदाणा यासारखे तेलपीक घेतल्यानंतर घरीच घाण्याचे तेल काढले जात होते. हेच तेल खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये वापरले जात होते. आता ही पिके घेतली जातात; पण घरी तेल तयार करणे बंद झाले आहे.

- गणेश इंगळे, शेतकरी

सुरुवातीला घरीच तेल तयार करून स्वयंपाकात वापरले जायचे. मात्र, आता तसे राहिले नाही. तेल विकत घ्यावे लागते. या तेलाचे दर कमी असो की जास्त, याला नाइलाज आहे. स्वत:चा शेतमाल असल्यानंतरही तेल तयार करता येत नाही.

- अमाेल क्षिरसागर, शेतकरी

गृहिणींचे बजेट कोलमडले!

सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये दरवाढ झाली होती. अशात ग्राहकांकडून सोयाबीन तेलाला सर्वाधिक मागणी होत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले; परंतु येत्या काही दिवसांमध्येही दरात आणखी घसरण होणार असल्याचे तेलविक्रेत्यांनी सांगितले.