शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

साडेतीन महिन्यानंतर अवघे ४४ टक्केच पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 12:01 IST

Crop Loan : एकूण उदिष्टाच्या ५० टक्केही पीक कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामामध्ये बँकांना पीक कर्जापोटी दिलेल्या उदिष्टाच्या अवघे ४४ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे. गेल्या साडेतीन महिन्यापासून पीक कर्ज वाटपास प्रारंभ झाला आहे. मात्र बँकांनी जिल्ह्यास दिलेल्या एकूण उदिष्टाच्या ५० टक्केही पीक कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच ३१ जुलै पीक कर्ज वाटपाची अखेरची मुदत आहे.त्यामुळे बँकांना पीक कर्ज वाटपाचा टक्का आता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच जिल्हयात जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास ७ टक्के पावसाची तूट होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या तर काही भागात पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. आता जिल्हयात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्या तरी पीक कर्ज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी उसणार करून पेरणी केली आहे. परिणामी किमानपक्षी शेतकऱ्यांना आता तरी पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्याची गरज आहे.बुलडाणा जिल्ह्याती बँकांना यंदाच्या खरीप १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १ हजार ३०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. यापैकी २१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ६५ हजार ८०४ शेतकऱ्यांना ५६९ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एकूण उदिष्टाच्या ते ४४ टक्के आहे. विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १ हजार कोटींनी पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट कमी झाले आहे. त्या उपरही पीक कर्जाचा टक्का वाढलेला नाही. त्यामुळे येत्या काळात बँकांना हा टक्का वाढवावा लागणार आहे. प्रसंगी ३० सप्टेंबर पर्यंत पीक कर्ज वाटप केले जाऊ शकते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्ज