शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

साडेतीन महिन्यानंतर अवघे ४४ टक्केच पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 12:01 IST

Crop Loan : एकूण उदिष्टाच्या ५० टक्केही पीक कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामामध्ये बँकांना पीक कर्जापोटी दिलेल्या उदिष्टाच्या अवघे ४४ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे. गेल्या साडेतीन महिन्यापासून पीक कर्ज वाटपास प्रारंभ झाला आहे. मात्र बँकांनी जिल्ह्यास दिलेल्या एकूण उदिष्टाच्या ५० टक्केही पीक कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच ३१ जुलै पीक कर्ज वाटपाची अखेरची मुदत आहे.त्यामुळे बँकांना पीक कर्ज वाटपाचा टक्का आता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच जिल्हयात जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास ७ टक्के पावसाची तूट होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या तर काही भागात पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. आता जिल्हयात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्या तरी पीक कर्ज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी उसणार करून पेरणी केली आहे. परिणामी किमानपक्षी शेतकऱ्यांना आता तरी पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्याची गरज आहे.बुलडाणा जिल्ह्याती बँकांना यंदाच्या खरीप १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १ हजार ३०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. यापैकी २१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ६५ हजार ८०४ शेतकऱ्यांना ५६९ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एकूण उदिष्टाच्या ते ४४ टक्के आहे. विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १ हजार कोटींनी पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट कमी झाले आहे. त्या उपरही पीक कर्जाचा टक्का वाढलेला नाही. त्यामुळे येत्या काळात बँकांना हा टक्का वाढवावा लागणार आहे. प्रसंगी ३० सप्टेंबर पर्यंत पीक कर्ज वाटप केले जाऊ शकते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्ज