शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

खाद्यतेलानंतर आता डाळींचे भावही भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:09 IST

Market News : सध्या खाद्यतेलाने चांगलाच भाव खाल्ला असताना डाळींचे दरही कडाडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असल्याने नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच आता महागाईनेही डोके वर काढल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सध्या खाद्यतेलाने चांगलाच भाव खाल्ला असताना डाळींचे दरही कडाडले आहेत. परिणामी अनेकांच्या ताटात वरण नसल्यागत झाले आहे.कोरोनाच्या महामारीत नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढविणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता नियमित सकस आहाराची आवश्यकता आहे. याकरिता रोजच्या जेवणात डाळींचे वरण हा मोठा आधार ठरतो; परंतु आता डाळींच्या दराने शतक पार केल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. नित्य वापरातील सोयाबीन तेलाचे दर १६० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.या भावात सातत्याने वाढ होत असून, यापाठोपाठ डाळींच्या दरांनीही उच्चांक गाठला आहे. अपवाद वगळता सर्व डाळींचे दर शंभरावर असल्याने ही महागडी डाळ सर्वसामान्य वर्गाला विकत घेणे परवडणारी नाही. त्यामुळे सामान्यांच्या नित्य भोजनातील वरण नाहीसे होणार का, अशी चिंता सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्याने हाताला काम नाही. मजूर वर्ग कमालीचा निराश व चिंतेत आहे. यातच महागाईनेही भर घातल्याने मजूरवर्ग आता दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.  जीवनावश्यक वस्तुंचे भाव कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरीकांमधून करण्यात येत आहे. का झाली डाळींच्या दरात वाढ? n यावर्षी खरीप हंगामातील पिकांना सततचा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने चांगलाच दणका दिला. याचा परिणाम तूर पिकावरही झाला असून, बऱ्याच शेतकऱ्यांची तूर सततच्या पावसाने करपून गेली. काहींना किडीच्या प्रादुर्भावामुळे फारसे उत्पादन होऊ शकले नाही. n हरभरा, मूग आणि उडीद आदी पिकांचीही हीच अवस्था राहिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. बऱ्याच शेतकयांचा लावलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे बाजारात आता डाळीच्या किमती वाढायला लागल्या आहेत.

रोजच्या जेवणात तुरीची डाळ हा अविभाज्य घटक आहे. लहान मुलांसह वृद्धांनासुद्धा जेवणात वरण अत्यावश्यक असते. आता डाळीचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेटही चांगलेच वाढले आहे. -वंदना करांगळे, गृहिणी

स्वयंपाक घरात नित्य वापरात येणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत. गॅस सिलिंडर, खाद्यतेल, मिरची-मसाला यासोबतच डाळींचेही दर वाढल्याने आता या महागाईत जगावे कसे, हा प्रश्न आहे.- प्रमिला मोरे, गृहिणी 

टॅग्स :khamgaonखामगावMarketबाजार