शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

खाद्यतेलानंतर आता डाळींचे भावही भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:09 IST

Market News : सध्या खाद्यतेलाने चांगलाच भाव खाल्ला असताना डाळींचे दरही कडाडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असल्याने नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच आता महागाईनेही डोके वर काढल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सध्या खाद्यतेलाने चांगलाच भाव खाल्ला असताना डाळींचे दरही कडाडले आहेत. परिणामी अनेकांच्या ताटात वरण नसल्यागत झाले आहे.कोरोनाच्या महामारीत नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढविणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता नियमित सकस आहाराची आवश्यकता आहे. याकरिता रोजच्या जेवणात डाळींचे वरण हा मोठा आधार ठरतो; परंतु आता डाळींच्या दराने शतक पार केल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. नित्य वापरातील सोयाबीन तेलाचे दर १६० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.या भावात सातत्याने वाढ होत असून, यापाठोपाठ डाळींच्या दरांनीही उच्चांक गाठला आहे. अपवाद वगळता सर्व डाळींचे दर शंभरावर असल्याने ही महागडी डाळ सर्वसामान्य वर्गाला विकत घेणे परवडणारी नाही. त्यामुळे सामान्यांच्या नित्य भोजनातील वरण नाहीसे होणार का, अशी चिंता सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्याने हाताला काम नाही. मजूर वर्ग कमालीचा निराश व चिंतेत आहे. यातच महागाईनेही भर घातल्याने मजूरवर्ग आता दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.  जीवनावश्यक वस्तुंचे भाव कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरीकांमधून करण्यात येत आहे. का झाली डाळींच्या दरात वाढ? n यावर्षी खरीप हंगामातील पिकांना सततचा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने चांगलाच दणका दिला. याचा परिणाम तूर पिकावरही झाला असून, बऱ्याच शेतकऱ्यांची तूर सततच्या पावसाने करपून गेली. काहींना किडीच्या प्रादुर्भावामुळे फारसे उत्पादन होऊ शकले नाही. n हरभरा, मूग आणि उडीद आदी पिकांचीही हीच अवस्था राहिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. बऱ्याच शेतकयांचा लावलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे बाजारात आता डाळीच्या किमती वाढायला लागल्या आहेत.

रोजच्या जेवणात तुरीची डाळ हा अविभाज्य घटक आहे. लहान मुलांसह वृद्धांनासुद्धा जेवणात वरण अत्यावश्यक असते. आता डाळीचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेटही चांगलेच वाढले आहे. -वंदना करांगळे, गृहिणी

स्वयंपाक घरात नित्य वापरात येणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत. गॅस सिलिंडर, खाद्यतेल, मिरची-मसाला यासोबतच डाळींचेही दर वाढल्याने आता या महागाईत जगावे कसे, हा प्रश्न आहे.- प्रमिला मोरे, गृहिणी 

टॅग्स :khamgaonखामगावMarketबाजार