शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

खाद्यतेलानंतर आता डाळींचे भावही भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:09 IST

Market News : सध्या खाद्यतेलाने चांगलाच भाव खाल्ला असताना डाळींचे दरही कडाडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असल्याने नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच आता महागाईनेही डोके वर काढल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सध्या खाद्यतेलाने चांगलाच भाव खाल्ला असताना डाळींचे दरही कडाडले आहेत. परिणामी अनेकांच्या ताटात वरण नसल्यागत झाले आहे.कोरोनाच्या महामारीत नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढविणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता नियमित सकस आहाराची आवश्यकता आहे. याकरिता रोजच्या जेवणात डाळींचे वरण हा मोठा आधार ठरतो; परंतु आता डाळींच्या दराने शतक पार केल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. नित्य वापरातील सोयाबीन तेलाचे दर १६० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.या भावात सातत्याने वाढ होत असून, यापाठोपाठ डाळींच्या दरांनीही उच्चांक गाठला आहे. अपवाद वगळता सर्व डाळींचे दर शंभरावर असल्याने ही महागडी डाळ सर्वसामान्य वर्गाला विकत घेणे परवडणारी नाही. त्यामुळे सामान्यांच्या नित्य भोजनातील वरण नाहीसे होणार का, अशी चिंता सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्याने हाताला काम नाही. मजूर वर्ग कमालीचा निराश व चिंतेत आहे. यातच महागाईनेही भर घातल्याने मजूरवर्ग आता दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.  जीवनावश्यक वस्तुंचे भाव कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरीकांमधून करण्यात येत आहे. का झाली डाळींच्या दरात वाढ? n यावर्षी खरीप हंगामातील पिकांना सततचा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने चांगलाच दणका दिला. याचा परिणाम तूर पिकावरही झाला असून, बऱ्याच शेतकऱ्यांची तूर सततच्या पावसाने करपून गेली. काहींना किडीच्या प्रादुर्भावामुळे फारसे उत्पादन होऊ शकले नाही. n हरभरा, मूग आणि उडीद आदी पिकांचीही हीच अवस्था राहिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. बऱ्याच शेतकयांचा लावलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे बाजारात आता डाळीच्या किमती वाढायला लागल्या आहेत.

रोजच्या जेवणात तुरीची डाळ हा अविभाज्य घटक आहे. लहान मुलांसह वृद्धांनासुद्धा जेवणात वरण अत्यावश्यक असते. आता डाळीचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेटही चांगलेच वाढले आहे. -वंदना करांगळे, गृहिणी

स्वयंपाक घरात नित्य वापरात येणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत. गॅस सिलिंडर, खाद्यतेल, मिरची-मसाला यासोबतच डाळींचेही दर वाढल्याने आता या महागाईत जगावे कसे, हा प्रश्न आहे.- प्रमिला मोरे, गृहिणी 

टॅग्स :khamgaonखामगावMarketबाजार