शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मृत्युनंतरही चौघांचे जीवन केले प्रकाशमान

By admin | Updated: January 28, 2016 00:13 IST

गोपाल वर्मांचे मरणोपरांत नेत्रदान.

मलकापूर (जि. बुलडाणा) : ब्रेनडेडमुळे मृत्यू झालेल्या मोताळा तालुक्यातील गोपाल वर्मा यांचे त्यांच्या कुटुंबियांनी मरणोपरांत नेत्रदान केल्यामुळे चार अंधांचे जीवन प्रकाशमान झाले आहे. मोताळा येथील रहिवासी असलेले परंतु औरंगाबाद येथे ज्वेलर्सचा व्यवसाय करणारे गोपाल भागचंद वर्मा यांचा आजारामुळे १७ जानेवारीला मृत्यू झाला. मृत्यूनंतरही त्यांचे अस्तित्व रहावे ही भावना ठेवून त्यांची पत्नी सीमा वर्मा यांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे अवयव दान करता आले नाही. परंतू त्यांच्या दोन्ही डोळ्यांनी चार अंधाचे जीवन प्रकाशमान केले आहे. चार अंध व्यक्तींना त्यामुळे सप्तरंगी दुनिया बघण्याची संधी मिळाली आहे. ब्रेनडेड मुळे औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटलमध्ये गोपाल वर्मा (४८) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान करण्याची भूमिका त्यांची पत्नी सीमा वर्मा यांनी घेतली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने त्यांच्या गोपाल वर्मा यांच्या पार्थिवाची तपासणी केली. मात्र त्यांचे ह्रदय, किडनी हे अवयव प्रत्यारोपणासाठी तांत्रिक दृ्ष्ट्या योग्य नसल्याचा समोर आले मात्र त्यांचे डोळे हे कामात येऊ शेकतात, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यास संमती देत त्यांचे डोळे काढण्यात आले. डोळ्यांतील कॉर्नियासह अन्य काही भागाची अंधांना गरज होती. त्यानुषंगाने त्याचे रोपन करण्यात आले. त्यामुळे चार अंधांच्या जीवनात सध्या प्रकाश उजळला आहे. दरम्यान, एक डोळा किमान तीन जणांना दृष्टीदेऊ शकतो, अशी प्रतिक्रिया मलकापूर येथील गणपती नेत्ररुग्णालयाचे डॉ. विजय पाटील यांनी दिली.