शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ‘उन्नत’ अभियान - भाऊसाहेब फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:10 IST

शेगावात राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प खारपाणपट्ट्यात राबविणार!

शेगाव : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यावर शासनाचा भर आहे. उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाची सुरुवात राज्यात केली असून, या अभियानाच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता २०२२ पर्यंत दुपटीने वाढविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर आ.डॉ.संजय कुटे, आ.आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, विस्तार व प्रशिक्षण संचालक एस.एल. जाधव, नियोजन व कृषी प्रक्रिया संचालक पी.आर. ठोकळ, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक पी.जी. इंगोले, संशोधन संचालक डी.एम. मानकर, विभागीय कृषी सहसंचालक शिवराज सरदार, विजय घावटे, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे आदी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर राज्यात जलसंधारणाची कामे होत असल्याचे सांगत कृषिमंत्री म्हणाले, खामगाव तालुक्यात तोरणा नदीवर २१ बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी उन्हाळी पिके घेत आहते, असेच चित्र राज्यात आहे. शेतकऱ्यांच्या बचत गटाला अनुदानावर छोटा टॅ्रक्टर साहित्यासह देण्यात येणार आहे. सदर शेतकरी गट या टॅ्रक्टरला भाड्याने देऊन उत्पन्न मिळवू शकणार आहे. कृषिमध्ये यांत्रिकीकरण, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २०२२ पर्यंत दुपटीने उत्पादन वाढ, कृषीपुरक व्यवसाय निर्माण करणे, कृषी योजनांमध्ये सुसूत्रता व सुधारणा करणे, दोन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आदी कार्यक्रम या ‘उन्नत शेती - समृद्ध शेतकरी’ अभियानातून राबविण्यात येणार आहे.ते पुढे म्हणाले, कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी कृषी सहायक, कृषी सेवक या गावपातळीवरील घटकावर अवलंबून आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांप्रती मानवतेच्या दृष्टिकोनातून वागले पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणायचे असतील, तर कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. जिल्ह्यात सीताफळ लागवडीचा १००० हेक्टरवर प्रयोग करण्यात येणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. प्रलंबित असलेल्या कृषीपंप वीज जोडण्या दोन वर्षांत या शासनाने पूर्ण केल्या आहेत. आता २०१७-१८ मध्ये मागेल त्याला कृषी पंप, वीज जोडणी देण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब मिशन राज्यात राबविण्यात येणार आहे. तसेच ठिबक सिंचनासाठी अर्ज करण्यास एक महिना कालावधीची मर्यादा रद्द करुन ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. नानाजी देशमुख कषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खारपाणपट्ट्यातील एक हजार गावांमध्ये जलसंधारण व कृषी विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच हवामानाचा अंदाज मिळण्यासाठी राज्यात दोन हजार ठिकाणी महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. आभार प्रकल्प संचालक (आत्मा) एन.एम. नाईक यांनी मानले. ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाचे माहिती पत्रक, घडी पुस्तिकेचे विमोचन४याप्रसंगी ‘उन्नत शेती- समृद्ध शेतकरी’ अभियानाचे माहिती पत्रक, घडी पुस्तिका यांचे विमोचन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ.डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, धृपदराव सावळे यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले. कृषी विभागातील विस्तार व प्रशिक्षण संचालक एस.एल. जाधव, शास्त्रज्ञ सी.पी. जायभाये, कृषी प्रक्रिया पी.एन. पोकळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित होते.