शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

प्रशासन निगरगट्ट ; मजुरांची जीवघेणी वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST

‘त्या’ अपघाताची जखम अजून भळभळती आहे. पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटरवरून मजूर महाराष्ट्रात येतात. समृध्दी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे ते ...

‘त्या’ अपघाताची जखम अजून भळभळती आहे. पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटरवरून मजूर महाराष्ट्रात येतात. समृध्दी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे ते केवळ सरकार सांगते म्हणून नाही तर या मजुरांच्या मेहनतीवर ते अवलंबून आहे. आजही अवजड मशीनरी आल्या पण एक कोपरा मजुरांशिवाय पूर्ण होत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य असतानाही गरीब मजुरांच्या जीवाशी होणारा खेळ आजही राजरोस सुरूच आहे. याला ना पोलीस, ना महसूल प्रशासन ना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून अटकाव केला जातो. तढेगाव शिवारात झालेल्या अपघातात मजूर लोखंडी रॉडखाली दबून मेले, त्यामुळे बांधकाम किंवा इतर अवजड साहित्य असलेल्या वाहनातून मजुरांची वाहतूक केली जाऊ शकत नाही किंवा मजुरांसाठी असलेल्या स्वतंत्र सीट व्यवस्था असलेल्या वाहनाने कोणत्याच साहित्य वाहतुकीला परवानगी नसते. हे नियम आहेत, परंतु याच नियमांचा अमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना विसर पडला का? भीषण घटना होऊनही यंत्रणांनी कोणतीच ‘समज’ घेतली नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या सिंदखेडराजा परिसरात सुरू असलेल्या समृध्दी आणि अन्य बांधकाम कामावर मजुरांची अशीच जीवघेणी अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. फरक इतकाच की टिप्परची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. प्रशासन, संबंधित यंत्रणांनी कारवाई का करू नये, किंवा समृध्दी किंवा अन्य मोठ्या प्रकल्पावरील, ते खासगी असो किंवा सरकारी अशा कोणत्याच ठेकेदाराने मजुरांची अशी जीवघेणी वाहतूक करू नये यासाठी कारवाई करणे गरजेचे असताना, अद्याप कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. इतकेच नाही तर तेरा मजुरांचा बळी घेणाऱ्या यंत्रणेतील मूळ जबाबदारांना अजूनही साधे चौकशीसाठी बोलावले गेले नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. म्हणजे एवढा अपघात होऊनही केस फाईल बंद करण्यावरच अधिकचा जोर दिला जात आहे का, असा प्रश्न आहे.