शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

गारखेड येथील समस्यांची प्रशासनाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:41 IST

गारखेड येथील १९७२ मध्ये बांधलेला मोती तलाव फुटून गाव जलमय होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे. याचसंदर्भात गावाचे इतरत्र पुनर्वसन व्हावे ...

गारखेड येथील १९७२ मध्ये बांधलेला मोती तलाव फुटून गाव जलमय होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे. याचसंदर्भात गावाचे इतरत्र पुनर्वसन व्हावे अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. रविवारी ग्रामस्थांनी पत्रकारांना गावात बोलावून याबाबतची वस्तुस्थिती दाखविली व आपल्या पुनर्वसनाच्या मागणीचा पुनरोच्चार केला होता. माध्यमात वृत्त प्रकाशित झाल्याने प्रशासनाने घाईघाईने सोमवारी गावात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत बोलताना तहसीलदार सुनील सावंत यांनी गावाच्या पुनर्वसनाची जी मागणी होत आहे त्याविषयी अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, तलावाला सांडवा असल्याने तलाव फुटण्याचा धोका प्रथमदर्शनी वाटत नसल्याचा शेरा त्यांनी दिला आहे. असे असले तरीही संबंधित विभागाकडे हा विषय पाठविला जाणार असल्याचे ते म्हणाले. तहसीलदार सावंत यांच्यासोबत असलेले पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता ढगे यांनी या तलावाची पाहणी करून गावकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, गावात रस्ते नाही. पाऊल वाटेने गावात पोहोचावे लागते. यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कळवून येथील रस्त्याची समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे जुनेद सिद्दीकी, पोलीस पाटील किशोर चव्हाण, स्थानिक तलाठी, राम लव्हकरे, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.