शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

वर्षभरात २५ वाहनांवर कारवाई!

By admin | Updated: May 25, 2017 00:51 IST

विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्यांकडून ४ लाख २५ हजाराचा दंड वसूल

संग्रामपूर : तालुक्यामधील नदी पात्रामधून विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गत वर्षात संग्रामपूर तहसील कार्यालयामार्फत २५ कारवाया करण्यात आल्या आहेत. या झालेल्या कारवायांमधून ४ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे.संग्रामपूर तालुक्यामधून वान नदी तसेच पूर्णा नदी वाहते. या नदीपात्रांमध्ये पावसाळा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाळू असते. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर तसेच शेगाव तालुक्यामधील रेती माफीया हे मोठ्या प्रमाणात विना परवाना रेतीची वाहतूक करीत असतात. अशा वाहनधारकांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एका वर्षामध्ये विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर तसेच ट्रकद्वारे रेतीची वाहतूक करणाऱ्यावर संग्रामपूर तहसील कार्यालयामार्फत २५ कारवाया करण्यात आल्या आहेत; मात्र तरीही मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीतही अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुक्यातील व बाळापूर तालुक्यातील रेती माफीया मोठ्या प्रमाणात विना परवाना रेतीची वाहतूक करीतच आहेत. तहसीलकडे वाहन नसल्यामुळे रेती चोरीत वाढ!गत तीन वर्षापासून संग्रामपूर तहसील कार्यालयाची तीन वाहने नादुरुस्त अवस्थेत पडलेले आहे. त्यामुळे तहसीलदारांना विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडण्यासाठी दुचाकीवर नदीपात्रात जावे लागते. रात्री-बेरात्री नदीपात्रात जाण्यासाठी तहसील कार्यालयाला चारचाकी वाहन उपलब्ध नसल्यामुळे याचा फायदा रेती माफीया घेत आहेत. रात्री-बेरात्री तहसीलदारांना दुचाकीवर नदीपात्रामध्ये जाता येत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या वाहनावर कारवाया करता येत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चोरट्यामार्गाने विना परवाना रेतीची वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देवून तहसील कार्यालयास तातडीने वाहन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.