शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २५ वाहनांवर कारवाई!

By admin | Updated: May 25, 2017 00:51 IST

विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्यांकडून ४ लाख २५ हजाराचा दंड वसूल

संग्रामपूर : तालुक्यामधील नदी पात्रामधून विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गत वर्षात संग्रामपूर तहसील कार्यालयामार्फत २५ कारवाया करण्यात आल्या आहेत. या झालेल्या कारवायांमधून ४ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे.संग्रामपूर तालुक्यामधून वान नदी तसेच पूर्णा नदी वाहते. या नदीपात्रांमध्ये पावसाळा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाळू असते. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर तसेच शेगाव तालुक्यामधील रेती माफीया हे मोठ्या प्रमाणात विना परवाना रेतीची वाहतूक करीत असतात. अशा वाहनधारकांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एका वर्षामध्ये विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर तसेच ट्रकद्वारे रेतीची वाहतूक करणाऱ्यावर संग्रामपूर तहसील कार्यालयामार्फत २५ कारवाया करण्यात आल्या आहेत; मात्र तरीही मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीतही अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुक्यातील व बाळापूर तालुक्यातील रेती माफीया मोठ्या प्रमाणात विना परवाना रेतीची वाहतूक करीतच आहेत. तहसीलकडे वाहन नसल्यामुळे रेती चोरीत वाढ!गत तीन वर्षापासून संग्रामपूर तहसील कार्यालयाची तीन वाहने नादुरुस्त अवस्थेत पडलेले आहे. त्यामुळे तहसीलदारांना विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडण्यासाठी दुचाकीवर नदीपात्रात जावे लागते. रात्री-बेरात्री नदीपात्रात जाण्यासाठी तहसील कार्यालयाला चारचाकी वाहन उपलब्ध नसल्यामुळे याचा फायदा रेती माफीया घेत आहेत. रात्री-बेरात्री तहसीलदारांना दुचाकीवर नदीपात्रामध्ये जाता येत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या वाहनावर कारवाया करता येत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चोरट्यामार्गाने विना परवाना रेतीची वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देवून तहसील कार्यालयास तातडीने वाहन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.