शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

विना परवानगी लग्न समारंभ करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही काही ठिकाणी धुमधडाक्यात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. लग्नसोहळे करणाऱ्यांनी लग्नमंडपात सावधान होण्याआधी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही काही ठिकाणी धुमधडाक्यात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. लग्नसोहळे करणाऱ्यांनी लग्नमंडपात सावधान होण्याआधी स्वत:च पहिले सावधान होणे गरजेचे झाले आहे.

‌ अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखली तालुक्यातील धोत्रा नाईक येथे १८ एप्रिल रोजी रमेश गोविंदा जाधव (वय ४५, रा. धोत्रा नाईक) यांनी त्यांच्या मुलीचा लग्न समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु लग्नसमारंभासाठी तहसीलदार चिखली यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने अखेर अमडापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच धोत्रा नाईक येथील गजानन तोताराम मिसाळ (वय ४५) यांनीसुद्धा त्यांच्या मुलींचे लग्न १९ एप्रिल रोजी आयोजित केले होते. परंतु त्यांनीसुद्धा कोणतीही शासनाची परवानगी न घेतल्याने त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही वधूपित्यांविरुद्ध तलाठी वनिता किशोर मोरे यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्ररीवरून विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे लग्न सोहळे साजरे करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना वाढतोय, नियम पाळा : ठाणेदार वानखेडे

कोरोना महामारीच्या संकटातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी कुठेही गर्दी करू नये, अशा शासनाकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत. शासनाच्या आदेशामध्ये २५ लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पाडा, असे असताना विनाकारण गर्दी जमू नये, असे आवाहन ठाणेदार अमित वानखेडे यांनी केले आहे. मुलीकडील असो वा मुलाकडील असो आनंदाचा क्षण असतो परंतु सध्या कोरोना महामारी या सारखे आजार पसरत असल्याने वऱ्हाडी मंडळीनी जास्त लोक न जमवता कमीत कमी लोकांमध्ये लग्नसोहळे साजरे करावे, असे आवाहनही ठाणेदारांनी केले आहे.