शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

विना परवानगी लग्न समारंभ करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही काही ठिकाणी धुमधडाक्यात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. लग्नसोहळे करणाऱ्यांनी लग्नमंडपात सावधान होण्याआधी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही काही ठिकाणी धुमधडाक्यात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. लग्नसोहळे करणाऱ्यांनी लग्नमंडपात सावधान होण्याआधी स्वत:च पहिले सावधान होणे गरजेचे झाले आहे.

‌ अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखली तालुक्यातील धोत्रा नाईक येथे १८ एप्रिल रोजी रमेश गोविंदा जाधव (वय ४५, रा. धोत्रा नाईक) यांनी त्यांच्या मुलीचा लग्न समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु लग्नसमारंभासाठी तहसीलदार चिखली यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने अखेर अमडापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच धोत्रा नाईक येथील गजानन तोताराम मिसाळ (वय ४५) यांनीसुद्धा त्यांच्या मुलींचे लग्न १९ एप्रिल रोजी आयोजित केले होते. परंतु त्यांनीसुद्धा कोणतीही शासनाची परवानगी न घेतल्याने त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही वधूपित्यांविरुद्ध तलाठी वनिता किशोर मोरे यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्ररीवरून विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे लग्न सोहळे साजरे करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना वाढतोय, नियम पाळा : ठाणेदार वानखेडे

कोरोना महामारीच्या संकटातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी कुठेही गर्दी करू नये, अशा शासनाकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत. शासनाच्या आदेशामध्ये २५ लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पाडा, असे असताना विनाकारण गर्दी जमू नये, असे आवाहन ठाणेदार अमित वानखेडे यांनी केले आहे. मुलीकडील असो वा मुलाकडील असो आनंदाचा क्षण असतो परंतु सध्या कोरोना महामारी या सारखे आजार पसरत असल्याने वऱ्हाडी मंडळीनी जास्त लोक न जमवता कमीत कमी लोकांमध्ये लग्नसोहळे साजरे करावे, असे आवाहनही ठाणेदारांनी केले आहे.