शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१४ गावांची भिस्त अधिग्रहणावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रताही गंभीर होत आहे. यामध्ये तालुक्यातील ४० गावे संभाव्य पाणीटंचाईत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रताही गंभीर होत आहे. यामध्ये तालुक्यातील ४० गावे संभाव्य पाणीटंचाईत येत असल्याने त्यानुषंगाने प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुषंगाने गत जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत १४ गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ विहिरी व बोअरचे अधिग्रहण केले असून, यातील दोन गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्तोत्रांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात जलसाठा असल्याने तालुक्याला गत वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कमी सोसावी लागणार आहे. असे असले तरी सुमारे ४० गावांचा पाणीपुरवठ्यावर यंदाच्या उन्हाळ्यात परिणाम होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत १४ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला असल्याने प्रशासनाने ९ गावांसाठी विहिरींचे, तर ४ गावांसाठी बोअरचे अधिग्रहण केले आहे. या अधिग्रहित विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे येत्या काळात शहरात पाणीपुरवठ्याच्या दिवसांत वाढ होण्याची शक्यता असली, तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. यानुषंगाने सद्य:स्थितीत पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या गावांत तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई पाहता त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या १४ पैकी दोन गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना नववर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यानुषंगाने ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करताच पंचायत समितीच्या वतीने विहिरी व बोअरच्या अधिग्रहणाची कारवाई करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

विहिरी व बोअरचे अधिग्रहण झालेले गाव

तालुक्यातील दिवठाणा, बोरगाव वसू, असोला बु., सोमठाणा, आमखेड, मिसाळवाडी, साकेगाव, तोरणवाडा, खैरव, नगर या नऊ गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर पेठ, डासाळा, खोर व बोरगाव काकडे या चार गावांमध्ये बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

दोन गावांना टँकरचा आधार !

तालुक्यातील असोला बु. आणि भोगावती-सैलानी नगर येथे सद्य:स्थितीत पाणीपुरवठ्याची समस्या उग्र झाली असल्याने याठिकाणी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यानुषंगाने असोला बु. येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठी भरोसा शिवारातील विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून, या अधिग्रहित विहिरीवरून टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा होत आहे, तर भोगावती-सैलानी नगर भागास खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

..............................