शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

१४ गावांची भिस्त अधिग्रहणावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रताही गंभीर होत आहे. यामध्ये तालुक्यातील ४० गावे संभाव्य पाणीटंचाईत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रताही गंभीर होत आहे. यामध्ये तालुक्यातील ४० गावे संभाव्य पाणीटंचाईत येत असल्याने त्यानुषंगाने प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुषंगाने गत जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत १४ गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ विहिरी व बोअरचे अधिग्रहण केले असून, यातील दोन गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्तोत्रांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात जलसाठा असल्याने तालुक्याला गत वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कमी सोसावी लागणार आहे. असे असले तरी सुमारे ४० गावांचा पाणीपुरवठ्यावर यंदाच्या उन्हाळ्यात परिणाम होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत १४ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला असल्याने प्रशासनाने ९ गावांसाठी विहिरींचे, तर ४ गावांसाठी बोअरचे अधिग्रहण केले आहे. या अधिग्रहित विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे येत्या काळात शहरात पाणीपुरवठ्याच्या दिवसांत वाढ होण्याची शक्यता असली, तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. यानुषंगाने सद्य:स्थितीत पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या गावांत तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई पाहता त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या १४ पैकी दोन गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना नववर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यानुषंगाने ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करताच पंचायत समितीच्या वतीने विहिरी व बोअरच्या अधिग्रहणाची कारवाई करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

विहिरी व बोअरचे अधिग्रहण झालेले गाव

तालुक्यातील दिवठाणा, बोरगाव वसू, असोला बु., सोमठाणा, आमखेड, मिसाळवाडी, साकेगाव, तोरणवाडा, खैरव, नगर या नऊ गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर पेठ, डासाळा, खोर व बोरगाव काकडे या चार गावांमध्ये बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

दोन गावांना टँकरचा आधार !

तालुक्यातील असोला बु. आणि भोगावती-सैलानी नगर येथे सद्य:स्थितीत पाणीपुरवठ्याची समस्या उग्र झाली असल्याने याठिकाणी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यानुषंगाने असोला बु. येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठी भरोसा शिवारातील विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून, या अधिग्रहित विहिरीवरून टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा होत आहे, तर भोगावती-सैलानी नगर भागास खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

..............................