शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

१४ गावांची भिस्त अधिग्रहणावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रताही गंभीर होत आहे. यामध्ये तालुक्यातील ४० गावे संभाव्य पाणीटंचाईत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रताही गंभीर होत आहे. यामध्ये तालुक्यातील ४० गावे संभाव्य पाणीटंचाईत येत असल्याने त्यानुषंगाने प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुषंगाने गत जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत १४ गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ विहिरी व बोअरचे अधिग्रहण केले असून, यातील दोन गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्तोत्रांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात जलसाठा असल्याने तालुक्याला गत वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कमी सोसावी लागणार आहे. असे असले तरी सुमारे ४० गावांचा पाणीपुरवठ्यावर यंदाच्या उन्हाळ्यात परिणाम होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत १४ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला असल्याने प्रशासनाने ९ गावांसाठी विहिरींचे, तर ४ गावांसाठी बोअरचे अधिग्रहण केले आहे. या अधिग्रहित विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे येत्या काळात शहरात पाणीपुरवठ्याच्या दिवसांत वाढ होण्याची शक्यता असली, तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. यानुषंगाने सद्य:स्थितीत पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या गावांत तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई पाहता त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या १४ पैकी दोन गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना नववर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यानुषंगाने ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करताच पंचायत समितीच्या वतीने विहिरी व बोअरच्या अधिग्रहणाची कारवाई करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

विहिरी व बोअरचे अधिग्रहण झालेले गाव

तालुक्यातील दिवठाणा, बोरगाव वसू, असोला बु., सोमठाणा, आमखेड, मिसाळवाडी, साकेगाव, तोरणवाडा, खैरव, नगर या नऊ गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर पेठ, डासाळा, खोर व बोरगाव काकडे या चार गावांमध्ये बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

दोन गावांना टँकरचा आधार !

तालुक्यातील असोला बु. आणि भोगावती-सैलानी नगर येथे सद्य:स्थितीत पाणीपुरवठ्याची समस्या उग्र झाली असल्याने याठिकाणी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यानुषंगाने असोला बु. येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठी भरोसा शिवारातील विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून, या अधिग्रहित विहिरीवरून टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा होत आहे, तर भोगावती-सैलानी नगर भागास खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

..............................