शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

पाटील, देशमुख पदवी सोडून मूळ आडनाव स्वीकारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 22:47 IST

सध्या संपूर्ण जग जागतिकिकरणाकडे जात असून, विज्ञान युगात जातीयतेच्या भिंती तोडून टाकण्याची गरज आहे. त्याकरिता दोन पावलं आपण पुढे येऊन पाटील, देशमुख, जहागिरदार

- विवेक चांदूरकर/ऑनलाइन लोकमत
 
सिंदखेडराजा (बुलडाणा), दि.12 -  सध्या संपूर्ण जग जागतिकिकरणाकडे जात असून, विज्ञान युगात जातीयतेच्या भिंती तोडून टाकण्याची गरज आहे. त्याकरिता दोन पावलं आपण पुढे येऊन पाटील, देशमुख, जहागिरदार, इनामदार या पदव्या सोडून आपले मूळ आडनाव लावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी समाजबांधवांना केले. 
राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांच्या ४१९ व्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे शिवधर्मपीठावर आयोजित कार्यक्रमात पुरुषोत्तम खेडेकर यांनी अध्यक्षस्थानावरून विचार व्यक्त केले. तारखेनुसार व तिथीनुसार राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी अनेक मान्यवरांनी राजवाड्यात जावून जिजाऊंच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर जिजाऊ सृष्टीवर दुपारी विविध कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सायंकाळी शिवधर्मपीठावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचारपीठावर खासदार छत्रपती संभाजी राजे, माजी आमदार रेखा खेडेकर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष छाया महाले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव मधुकर मेहकरे, शिवधर्म संसद सदस्य देवानंद कापसे, नेताजी गोरे, चंद्रशेखर शिखरे, विजया कोकाटे, तनपुरे, गंगाधर बनबरे, पप्पू भोयर, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष तारक, डॉ. राम मुरकुटे, डॉ. राजीव चव्हाण, गंगाधर महाराज कुरूंदकर, शिवाजीराजे पाटील, हरियाणाचे सुरजित दाभाडे, कर्नाटकवरून आलेले वैजनाथ बिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी बोलताना अँड. खेडेकर म्हणाले की, आता काळ बदलला आहे. त्यानुसार आपल्यालाही बदलावे लागेल. शिवाजी महाराजांनी घोडा व तलवारीने युद्ध लढले. आता मात्र घोडा व तलवारीने युद्ध न करता पेन, शाई व कॉम्प्युटरच्या माध्यमातून युद्ध करावे लागणार आहे. आगामी काळात प्रस्थापितांना लोक धडा शिकविणार असून, शेतकरी व शेतमजुरांचे राज्य येणार आहे. यापुढे मराठय़ांनी पंचसत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. इंजिनियर व डॉक्टर होण्यासोबतच चित्रपट सृष्टी, क्रीडा क्षेत्रातही आपल्या मुलांना सहभागी व्हायला लावा. या क्षेत्रात पैसा व प्रसिद्धी आहे. हे क्षेत्रही काबीज करण्यासाठी मुलांना मदत करा. संपूर्ण राज्यभर मराठय़ांचे मोर्चे काढण्यात आले. या मोर्चाला सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. या मोर्चाचे आयोजन करण्यात मराठा सेवा संघाचा कसा सहभाग आहे, हे लिखित स्वरूपात मांडायला हवे, अन्यथा काही वर्षांनी अन्य कुणी याचे श्रेय घेईल. मराठा मोर्चात महिलांचा सहभाग अधिक होता. तो तेवढय़ापुरताच न राहता यानंतरही विविध क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यायला हवा, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. 
सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात प्रतीक्षा हर्षे या मुलीने जिजाऊ वंदना म्हणून करण्यात आली. त्यानंतर मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे म्हणाले की, मराठा सेवा संघाचा विचार हा केवळ महाराष्ट्रापुरता आता र्मयादित राहिला नसून, देशव्यापी झाला आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष छाया महाले म्हणाल्या की, मराठा मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. महिला प्रत्येक मोर्चात अग्रस्थानी होत्या. हे जिजाऊ ब्रिगेडचे यश आहे. वैचारिक अंगाने व सुसंस्कृतपणे महिलांनी आतापर्यंत आंदोलने केली आहेत व यानंतरही आंदोलन करणार असल्याचे महाले यांनी सांगितले. विचारवंत कक्षाचे प्रमुख गंगाधर बनबरे म्हणाले की, आम्ही ज्ञानाचे शस्त्र घेऊन क्रांतीची भाषा करीत आहोत. पूर्वी राजाच्या पोटी राजे जन्माला येत होते, आता नेत्यांच्या पोटी नेते जन्माला येत आहेत. आम्हाला ही परंपरा खंडित करायची आहे. शेतकर्‍यांची, सामान्यांची मुले संसदेत जावी, याकरिता संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्षात रूपांतरीत करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रवक्ता प्रदीप भानुसे यांनी केले. 
जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ सृष्टीवर ४00 पेक्षा जास्त पुस्तकांची दुकाने थाटण्यात आली होती. येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंच्या मूर्तीसमोर दिवसभर नागरिकांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले. 
 
शिवराय, शाहू महाराजांच्या विचारांचा वारस - संभाजी राजे भोसले 
महाराष्ट्रालाच नाही तर देशाला समानतेची विचारधारा देणारे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्या रक्ताचाच मी वारस नाही तर त्यांच्या विचारांचा वारस असल्याचे प्रतिपादन खा. संभाजीराजे भोसले यांनी केले. ते म्हणाले की, मी बहुजनांची विचारधारा मानणारा आहे. मराठय़ांचा, बहुजनांना आवाज मी संसदेत उचलणार आहे. ज्या घराण्यातून मी आलो त्यांचे विचार देशभर पसरविण्याचे कार्य मी करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचे नाव मी दिल्लीत गाजविल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
 
गडकरींचा पुतळा तोडणार्‍यांचा सत्कार 
पुण्यामध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा नुकताच संभाजी ब्रिगेडने तोडला. हा पुतळा तोडणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा यावेळी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
 
सत्यपाल महाराज यांनी दिली शपथ 
यावेळी संदीपपाल महाराज यांचे कीर्तन झाले. त्यानंतर सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी उपस्थितांना दारू पिणार नाही, गुटखा खाणार नाही, हुंडा घेणार नाही, महिलांना त्रास देणार नाही, अशी शपथ दिली. तरूणांनी व्यसनमुक्त होण्याचे आवाहन यावेळी सत्यपाल महाराज यांनी केले.