शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आट्या- पाट्या या खेळाने सशक्त खेळाडू तयार होतो : डॉ. दीपक कविश्वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 13:26 IST

आट्यापाट्या या खेळामुळे  सर्व गुण विकासीत होवून सशक्त  खेळाडू तयार  होतो, असे आॅल इंडिया आट्यापाट्या  फेडरेशनचे सेक्रेटरी डॉ. दीपक कविश्वर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले .

- योगेश फरपट

खामगाव : आट्यापाट्या हा खेळ भारतातील पुरातन, देशी तसेच कमी खर्चिक खेळ असून इंटरनॅशनल चॅम्पयनशिप मध्ये आतापर्यंत भारताला चार वेळा सुवर्णपदक मिळालेले आहे. आट्यापाट्या या खेळामुळे  सर्व गुण विकासीत होवून सशक्त  खेळाडू तयार  होतो, असे आॅल इंडिया आट्यापाट्या  फेडरेशनचे सेक्रेटरी डॉ. दीपक कविश्वर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले .

प्रश्न : आट्या पाट्या या खेळाबद्दल काय सांगू शकाल ? आट्यापाट्या हा पुरातन काळी पाण्याच्या पाट्या आखून मैदान तयार करून चंद्रप्रकाशात खेळला जात होता. सन १९८१ साली तत्कालीन खासदार श्री.वा.धाबे यांनी खेळाला पुनरुज्जीवीत केले. पहिली राष्ट्रीय स्पर्धा नागपूर येथे झाली. तेव्हा ७ राज्य होती. त्यानंतर आट्यापाट्या खेळाचा विकास होत गेला. आज २५ राज्यात तर महाराष्ट्रातील २८ जिल्हयात हा खेळ खेळला जातो. केंद्रीय क्रिडा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली तसेच महाराष्ट्रात राज्य सरकारची या खेळाला मान्यता आहे. याशिवाय महाराष्ट्र आॅलिम्पीकची मान्यता आहे. 

प्रश्न : आट्या पाट्या या खेळाला आजही का महत्व आहे. आट्यापाट्या हा खेळ भारतातील ग्रामिण व शहरी क्षेत्रात लोकप्रिय खेळ आहे. महाराष्ट्रात शालेय व महाविद्यालयीन स्तरावर पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी व आट्यापाट्या खेळाचा परिचय करण्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू महाराष्ट्रातून निर्माण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  

प्रश्न : आट्यापाट्या हा खेळ लोकापर्यत का पोहचू शकला नाही ़?आट्यापाट्या या खेळाबाबत लोकामध्ये जागरुकता नाही. त्यामुळे या खेळासाठी स्पॉन्सरशीप मिळत नाही ही खंत आहे. वास्तविक या खेळामुळे खेळाडूंची शारिरीक क्षमता मजबूत होवून सशक्त खेळाडू तयार होतो. त्याच्यामध्ये सहनशीलतेसह सर्व गुण विकसीत होण्यास मदत होते. त्यामुळे या खेळाला पुढे आणण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. प्रसिद्धी माध्यमांनी देखील या खेळाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे असे वाटते. 

प्रश्न : खेळाडूंना आरक्षण आहे काय ?खो-खो, कबडड्ी या खेळाप्रमाणे आटयापाट्या देशी खेळ असून पूर्वी खो खो कबड्डीप्रमाणे या खेळाला पाच टक्के आरक्षण होते. परंतू २०१६ मध्ये सरकारने पाच टक्के आरक्षण बंद केले. त्यानंतर आॅल इंडिया आट्यापाट्या फेडरेशनचे वतीने राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे खेळाडूंना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

प्रश्न : सरकारकडून काय अपेक्षा आहे? आट्या पाट्या या खेळाचा शालेयस्तरावर समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे शालेय स्तरावर आट्यापाट्या स्पर्धा सर्वत्रच संपन्न होत आहे. सरकारकडून आट्यापाट्या खेळांडूसाठी शिवछत्रतपी पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत २५ खेळाडू व संघटनकांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. असे असतांना सर्व खेळांना आरक्षण आहे. मग या खेळाला आरक्षण का नाही असा प्रश्न आहे. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून खेळांडूंना आरक्षण देण्याची गरज आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत