शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आट्या- पाट्या या खेळाने सशक्त खेळाडू तयार होतो : डॉ. दीपक कविश्वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 13:26 IST

आट्यापाट्या या खेळामुळे  सर्व गुण विकासीत होवून सशक्त  खेळाडू तयार  होतो, असे आॅल इंडिया आट्यापाट्या  फेडरेशनचे सेक्रेटरी डॉ. दीपक कविश्वर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले .

- योगेश फरपट

खामगाव : आट्यापाट्या हा खेळ भारतातील पुरातन, देशी तसेच कमी खर्चिक खेळ असून इंटरनॅशनल चॅम्पयनशिप मध्ये आतापर्यंत भारताला चार वेळा सुवर्णपदक मिळालेले आहे. आट्यापाट्या या खेळामुळे  सर्व गुण विकासीत होवून सशक्त  खेळाडू तयार  होतो, असे आॅल इंडिया आट्यापाट्या  फेडरेशनचे सेक्रेटरी डॉ. दीपक कविश्वर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले .

प्रश्न : आट्या पाट्या या खेळाबद्दल काय सांगू शकाल ? आट्यापाट्या हा पुरातन काळी पाण्याच्या पाट्या आखून मैदान तयार करून चंद्रप्रकाशात खेळला जात होता. सन १९८१ साली तत्कालीन खासदार श्री.वा.धाबे यांनी खेळाला पुनरुज्जीवीत केले. पहिली राष्ट्रीय स्पर्धा नागपूर येथे झाली. तेव्हा ७ राज्य होती. त्यानंतर आट्यापाट्या खेळाचा विकास होत गेला. आज २५ राज्यात तर महाराष्ट्रातील २८ जिल्हयात हा खेळ खेळला जातो. केंद्रीय क्रिडा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली तसेच महाराष्ट्रात राज्य सरकारची या खेळाला मान्यता आहे. याशिवाय महाराष्ट्र आॅलिम्पीकची मान्यता आहे. 

प्रश्न : आट्या पाट्या या खेळाला आजही का महत्व आहे. आट्यापाट्या हा खेळ भारतातील ग्रामिण व शहरी क्षेत्रात लोकप्रिय खेळ आहे. महाराष्ट्रात शालेय व महाविद्यालयीन स्तरावर पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी व आट्यापाट्या खेळाचा परिचय करण्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू महाराष्ट्रातून निर्माण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  

प्रश्न : आट्यापाट्या हा खेळ लोकापर्यत का पोहचू शकला नाही ़?आट्यापाट्या या खेळाबाबत लोकामध्ये जागरुकता नाही. त्यामुळे या खेळासाठी स्पॉन्सरशीप मिळत नाही ही खंत आहे. वास्तविक या खेळामुळे खेळाडूंची शारिरीक क्षमता मजबूत होवून सशक्त खेळाडू तयार होतो. त्याच्यामध्ये सहनशीलतेसह सर्व गुण विकसीत होण्यास मदत होते. त्यामुळे या खेळाला पुढे आणण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. प्रसिद्धी माध्यमांनी देखील या खेळाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे असे वाटते. 

प्रश्न : खेळाडूंना आरक्षण आहे काय ?खो-खो, कबडड्ी या खेळाप्रमाणे आटयापाट्या देशी खेळ असून पूर्वी खो खो कबड्डीप्रमाणे या खेळाला पाच टक्के आरक्षण होते. परंतू २०१६ मध्ये सरकारने पाच टक्के आरक्षण बंद केले. त्यानंतर आॅल इंडिया आट्यापाट्या फेडरेशनचे वतीने राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे खेळाडूंना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

प्रश्न : सरकारकडून काय अपेक्षा आहे? आट्या पाट्या या खेळाचा शालेयस्तरावर समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे शालेय स्तरावर आट्यापाट्या स्पर्धा सर्वत्रच संपन्न होत आहे. सरकारकडून आट्यापाट्या खेळांडूसाठी शिवछत्रतपी पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत २५ खेळाडू व संघटनकांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. असे असतांना सर्व खेळांना आरक्षण आहे. मग या खेळाला आरक्षण का नाही असा प्रश्न आहे. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून खेळांडूंना आरक्षण देण्याची गरज आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत