शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

९० हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST

बुलडाणा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन दीड महिना लाेटला आहे़ तरीही पीक कर्ज वाटपाची गती वाढत नसल्याचे चित्र आहे़ ...

बुलडाणा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन दीड महिना लाेटला आहे़ तरीही पीक कर्ज वाटपाची गती वाढत नसल्याचे चित्र आहे़ निर्धारित लक्ष्यांकाच्या जवळपासही पीक कर्ज वाटप झाले नाही़ २५ जूनपर्यंत केवळ ४९ हजार ९६४ शेतकऱ्यांना ४४० काेटी ५६ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील ९० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाची अजूनही प्रतीक्षा आहे़

काेराेनामुळे गत वर्षीपासून शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ शेतमाल विकण्याच्या वेळीच निर्बंध लावण्यात येत असल्याने भाव मिळाला नाही़ यावर्षीही तीच परिस्थिती हाेती़ २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे नगदी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ हाताताेंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला हाेता़ या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली़ पीक कर्ज मिळेल या आशेने जिल्ह्यातील शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत़;मात्र त्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यात यावर्षी १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले हाेते़ त्यापैकी २५ जूनपर्यंत केवळ ४९ हजार ९६४ शेतकऱ्यांना ४४० काेेटी ५६ लाख रुपयांचे कर्जच वितरित करण्यात आले़ केवळ ३६ टक्के शेतकऱ्यांनाच हे कर्ज वाटप करण्यात आले असून ६४ टक्के शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत़

राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता

पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे़ बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वितरण हाेत नसल्याचे चित्र आहे़ सर्वात कमी पीक कर्ज बँक ऑफ बडाेदाने वितरित केले आहे़ या बँकेने केवळ ६ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे़ तसेच अलाहाबाद बँक १४ टक्के, युकाे आणि कॅनरा बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या १९ टक्के कर्ज वाटप केले आहे़ बँक ऑफ इंडियाने ५९ टक्के कर्ज वाटप केले आहे़ आयडीबीआय बँकेने ६६ टक्के कर्ज वाटप केले आहे़

अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मृग नक्षत्राच्या पावसावर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती़ त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले़ पीक कर्ज मिळेल, या आशेवर अनेकांनी उसनवारी करून पेरणी केली़ त्यातच दुबार पेरणी करावी लागल्याने पुन्हा बियाणे, खते कशी विकत आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़