शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

९० हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST

बुलडाणा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन दीड महिना लाेटला आहे़ तरीही पीक कर्ज वाटपाची गती वाढत नसल्याचे चित्र आहे़ ...

बुलडाणा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन दीड महिना लाेटला आहे़ तरीही पीक कर्ज वाटपाची गती वाढत नसल्याचे चित्र आहे़ निर्धारित लक्ष्यांकाच्या जवळपासही पीक कर्ज वाटप झाले नाही़ २५ जूनपर्यंत केवळ ४९ हजार ९६४ शेतकऱ्यांना ४४० काेटी ५६ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील ९० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाची अजूनही प्रतीक्षा आहे़

काेराेनामुळे गत वर्षीपासून शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ शेतमाल विकण्याच्या वेळीच निर्बंध लावण्यात येत असल्याने भाव मिळाला नाही़ यावर्षीही तीच परिस्थिती हाेती़ २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे नगदी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ हाताताेंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला हाेता़ या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली़ पीक कर्ज मिळेल या आशेने जिल्ह्यातील शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत़;मात्र त्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यात यावर्षी १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले हाेते़ त्यापैकी २५ जूनपर्यंत केवळ ४९ हजार ९६४ शेतकऱ्यांना ४४० काेेटी ५६ लाख रुपयांचे कर्जच वितरित करण्यात आले़ केवळ ३६ टक्के शेतकऱ्यांनाच हे कर्ज वाटप करण्यात आले असून ६४ टक्के शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत़

राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता

पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे़ बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वितरण हाेत नसल्याचे चित्र आहे़ सर्वात कमी पीक कर्ज बँक ऑफ बडाेदाने वितरित केले आहे़ या बँकेने केवळ ६ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे़ तसेच अलाहाबाद बँक १४ टक्के, युकाे आणि कॅनरा बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या १९ टक्के कर्ज वाटप केले आहे़ बँक ऑफ इंडियाने ५९ टक्के कर्ज वाटप केले आहे़ आयडीबीआय बँकेने ६६ टक्के कर्ज वाटप केले आहे़

अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मृग नक्षत्राच्या पावसावर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती़ त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले़ पीक कर्ज मिळेल, या आशेवर अनेकांनी उसनवारी करून पेरणी केली़ त्यातच दुबार पेरणी करावी लागल्याने पुन्हा बियाणे, खते कशी विकत आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़