शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

९0 टक्के शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:20 IST

कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. शासनाने अर्ज भरण्यासाठी गावोगावी केंद्र उभारल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज भरता आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणार्‍या अडचणींची शर्यत पार करून नोंदणीकृत शेतकर्‍यांपैकी ८९.३२ टक्के शेतकरी अर्ज भरण्यात यशस्वी झाले.  

ठळक मुद्दे३ लाख ८३ हजार शेतकर्‍यांनी केली होती नोंदणी३.४२ लाख शेतकर्‍यांनी भरले अर्ज विभागात बुलडाण्याचे सर्वाधिक अर्ज 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. शासनाने अर्ज भरण्यासाठी गावोगावी केंद्र उभारल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज भरता आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणार्‍या अडचणींची शर्यत पार करून नोंदणीकृत शेतकर्‍यांपैकी ८९.३२ टक्के शेतकरी अर्ज भरण्यात यशस्वी झाले.  शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देताना खरे लाभार्थी यापासून वंचित राहू नये, एकाच शेतकर्‍यांकडून दोन वेळा अर्ज येऊ नये तसेच चुकीच्या लाभार्थींना या योजनेचा लाभ होऊ नये, यासाठी शासनाने कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्याची सुविधा निर्माण केली आहे. त्याकरिता गावोगावी संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची जबाबदारी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान म्हणजेच आय.टी. विभागावर आहे, तर ही माहिती पुरविण्याचे काम सहकार खात्यावर आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे कर्जमाफीचे काम सुलभ झाले; मात्र काही ठिकाणी विविध अडचणी आल्याने शेतकर्‍यांना अर्ज भरता आले नाहीत. कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येत असून, शासन स्तरावरून ते दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अडचीणीनंतरही जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ४२ हजार ५३४ अर्ज भरण्यात आले आहेत.  कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८९.३२ टक्के शेतकर्‍यांचे अर्ज भरण्यात आले आहेत.  १५ सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ पाच दिवस अर्ज भरण्यासाठी उरले असून, या पाच दिवसांत आपला अर्ज भरला जावा, यासाठी शेतकरी सर्व कामे सोडून दिवस-रात्र अर्ज भरण्याच्या केंद्रावर बसत आहेत.  त्यामुळे संगणक परिचालकांनाही अडचणींची शर्यत पार करून कमी दिवसांत जास्त अर्ज भरावे लागणार आहेत.

अमरावती विभागात बुलडाण्याचे सर्वाधिक अर्ज अमरावती विभागामध्ये आजपर्यंत ११ लाख ३६ हजार ९९४ शेतकर्‍यांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्‍यांनी अर्ज भरले आहेत, तर अकोला जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ६४८, वाशिम १ लाख ६१ हजार १३६, अमरावती १ लाख ९७ हजार २३८ व यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ७९ हजार ४३८ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरले आहेत.

अशा येताहेत अडचणीकर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज ज्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भरायचे आहेत, ते संकेतस्थळसुद्धा अनेक वेळा हँग होत असून, लिंक मिळत नाही. अनेक शेतकर्‍यांकडे आधारकार्ड नाही, तर काही शेतकर्‍यांच्या आधारकार्डला मोबाइल नंबरची नोंद नसल्याने त्यांना ‘वन टाइम पासवर्ड’ मिळत नाही. अशा शेतकर्‍यांचे थम्ब इम्प्रेशन घेऊन हा अर्ज भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येत असली, तरी त्यांचे थम्ब  इम्प्रेशन जुळत नाहीत. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अर्ज भरता आला तर भरलेल्या अर्जाची प्रतच मिळत नाही. सदर अडचणी दूर करण्यासाठी महसूल विभागाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.