शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

९0 टक्के शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:20 IST

कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. शासनाने अर्ज भरण्यासाठी गावोगावी केंद्र उभारल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज भरता आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणार्‍या अडचणींची शर्यत पार करून नोंदणीकृत शेतकर्‍यांपैकी ८९.३२ टक्के शेतकरी अर्ज भरण्यात यशस्वी झाले.  

ठळक मुद्दे३ लाख ८३ हजार शेतकर्‍यांनी केली होती नोंदणी३.४२ लाख शेतकर्‍यांनी भरले अर्ज विभागात बुलडाण्याचे सर्वाधिक अर्ज 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. शासनाने अर्ज भरण्यासाठी गावोगावी केंद्र उभारल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज भरता आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणार्‍या अडचणींची शर्यत पार करून नोंदणीकृत शेतकर्‍यांपैकी ८९.३२ टक्के शेतकरी अर्ज भरण्यात यशस्वी झाले.  शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देताना खरे लाभार्थी यापासून वंचित राहू नये, एकाच शेतकर्‍यांकडून दोन वेळा अर्ज येऊ नये तसेच चुकीच्या लाभार्थींना या योजनेचा लाभ होऊ नये, यासाठी शासनाने कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्याची सुविधा निर्माण केली आहे. त्याकरिता गावोगावी संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची जबाबदारी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान म्हणजेच आय.टी. विभागावर आहे, तर ही माहिती पुरविण्याचे काम सहकार खात्यावर आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे कर्जमाफीचे काम सुलभ झाले; मात्र काही ठिकाणी विविध अडचणी आल्याने शेतकर्‍यांना अर्ज भरता आले नाहीत. कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येत असून, शासन स्तरावरून ते दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अडचीणीनंतरही जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ४२ हजार ५३४ अर्ज भरण्यात आले आहेत.  कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८९.३२ टक्के शेतकर्‍यांचे अर्ज भरण्यात आले आहेत.  १५ सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ पाच दिवस अर्ज भरण्यासाठी उरले असून, या पाच दिवसांत आपला अर्ज भरला जावा, यासाठी शेतकरी सर्व कामे सोडून दिवस-रात्र अर्ज भरण्याच्या केंद्रावर बसत आहेत.  त्यामुळे संगणक परिचालकांनाही अडचणींची शर्यत पार करून कमी दिवसांत जास्त अर्ज भरावे लागणार आहेत.

अमरावती विभागात बुलडाण्याचे सर्वाधिक अर्ज अमरावती विभागामध्ये आजपर्यंत ११ लाख ३६ हजार ९९४ शेतकर्‍यांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्‍यांनी अर्ज भरले आहेत, तर अकोला जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ६४८, वाशिम १ लाख ६१ हजार १३६, अमरावती १ लाख ९७ हजार २३८ व यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ७९ हजार ४३८ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरले आहेत.

अशा येताहेत अडचणीकर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज ज्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भरायचे आहेत, ते संकेतस्थळसुद्धा अनेक वेळा हँग होत असून, लिंक मिळत नाही. अनेक शेतकर्‍यांकडे आधारकार्ड नाही, तर काही शेतकर्‍यांच्या आधारकार्डला मोबाइल नंबरची नोंद नसल्याने त्यांना ‘वन टाइम पासवर्ड’ मिळत नाही. अशा शेतकर्‍यांचे थम्ब इम्प्रेशन घेऊन हा अर्ज भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येत असली, तरी त्यांचे थम्ब  इम्प्रेशन जुळत नाहीत. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अर्ज भरता आला तर भरलेल्या अर्जाची प्रतच मिळत नाही. सदर अडचणी दूर करण्यासाठी महसूल विभागाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.