शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

बुलडाणा जिल्ह्यात आठ नवीन वीज उपकेंद्र!

By admin | Updated: August 23, 2016 01:51 IST

‘दिशा’ अंतर्गत शासकीय योजनांचा आढावा.

बुलडाणा, दि. २२ : ग्रामीण ज्योती योजनेतून सोयगावसह पेठ, उंद्री, लाखनवाडा, करमोडा, अशा आठ गावांचा सबस्टेशनसाठी लवकरच महावितरण काम सुरू करणार आहे. या आठ उपकेंद्रांमुळे जिल्ह्यात वीज पुरवठय़ाचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती(दिशा)च्यावतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकार्‍यांनी जिल्ह्यात आठ उपकेंद्र सुरू करणार असल्याची माहिती दिली. यावेळी खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नरेंद्र टापरे, नगराध्यक्ष टी.डी. अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तळागळातील लोकांना न्याय मिळण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. विकासात्मक बदलांसाठी या योजनांची अंमलबजावणी तत्परतेने करावी, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी अधिकार्‍यांना केल्या. यावेळी खासदार जाधव यांनी केंद्र शासनाच्या संबंधित व राज्य शासनाच्या अख्त्यारितील योजनांचा आढावा अधिकार्‍यांकडून घेतला. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, कृषी सिंचन योजना, डिजिटल भारत कार्यक्रम, ग्रामीण ज्योती योजना, रुर्बन मिशन, पीक विमा योजना, सर्व शिक्षा अभियान यासह हायवे व रेल्वेच्या संदर्भातील कामांचा लेखाजोखा अधिकार्‍यांनी सादर केला. खा.प्रतापराव जाधव यांनी रोजगार हमीच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. लोणारच्या सेवानवृत्त बीडीओ संदर्भात चौकशीच्या सूचनाही यंत्रणेला केल्या. अकुशल लोकांना कुशल बनविण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश दिले. ग्रामसडक योजनेची कामे नोव्हेंबरपर्यंत मार्गी लावण्याचे सांगत आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकमेव निवड झालेल्या बुलडाणा शहरातील घरकुलांच्या संदर्भात यंत्रणेने पाऊले उचलण्याचे ते म्हणाले. शेगाव येथील रेल्वेस्थानकाच्या कामासंदर्भात विभाग प्रमुखांना सूचना करत जळगाव, देऊळगावराजा, मेहकर आणि चिखली येथे पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकीट काऊंटर उघडण्यात यावे, असे सांगितले. यावेळी उपस्थित नसलेल्या काही विभाग प्रमुखांना नोटीस पाठविण्याच्या सूचनासुद्धा खा. जाधव यांनी केल्या. निधी केंद्राचा आणि यंत्रणा राज्य सरकारची असली तरी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात ह्यदिशाह्ण च्या माध्यमातून पाठपुरावा करत राहू, असे सांगून काही विभागांच्या कामांबद्दल नाराजीदेखील व्यक्त केली. यावेळी अधिकारी, शिवसेना पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.