शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

बुलडाणा जिल्ह्यात आठ नवीन वीज उपकेंद्र!

By admin | Updated: August 23, 2016 01:51 IST

‘दिशा’ अंतर्गत शासकीय योजनांचा आढावा.

बुलडाणा, दि. २२ : ग्रामीण ज्योती योजनेतून सोयगावसह पेठ, उंद्री, लाखनवाडा, करमोडा, अशा आठ गावांचा सबस्टेशनसाठी लवकरच महावितरण काम सुरू करणार आहे. या आठ उपकेंद्रांमुळे जिल्ह्यात वीज पुरवठय़ाचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती(दिशा)च्यावतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकार्‍यांनी जिल्ह्यात आठ उपकेंद्र सुरू करणार असल्याची माहिती दिली. यावेळी खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नरेंद्र टापरे, नगराध्यक्ष टी.डी. अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तळागळातील लोकांना न्याय मिळण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. विकासात्मक बदलांसाठी या योजनांची अंमलबजावणी तत्परतेने करावी, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी अधिकार्‍यांना केल्या. यावेळी खासदार जाधव यांनी केंद्र शासनाच्या संबंधित व राज्य शासनाच्या अख्त्यारितील योजनांचा आढावा अधिकार्‍यांकडून घेतला. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, कृषी सिंचन योजना, डिजिटल भारत कार्यक्रम, ग्रामीण ज्योती योजना, रुर्बन मिशन, पीक विमा योजना, सर्व शिक्षा अभियान यासह हायवे व रेल्वेच्या संदर्भातील कामांचा लेखाजोखा अधिकार्‍यांनी सादर केला. खा.प्रतापराव जाधव यांनी रोजगार हमीच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. लोणारच्या सेवानवृत्त बीडीओ संदर्भात चौकशीच्या सूचनाही यंत्रणेला केल्या. अकुशल लोकांना कुशल बनविण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश दिले. ग्रामसडक योजनेची कामे नोव्हेंबरपर्यंत मार्गी लावण्याचे सांगत आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकमेव निवड झालेल्या बुलडाणा शहरातील घरकुलांच्या संदर्भात यंत्रणेने पाऊले उचलण्याचे ते म्हणाले. शेगाव येथील रेल्वेस्थानकाच्या कामासंदर्भात विभाग प्रमुखांना सूचना करत जळगाव, देऊळगावराजा, मेहकर आणि चिखली येथे पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकीट काऊंटर उघडण्यात यावे, असे सांगितले. यावेळी उपस्थित नसलेल्या काही विभाग प्रमुखांना नोटीस पाठविण्याच्या सूचनासुद्धा खा. जाधव यांनी केल्या. निधी केंद्राचा आणि यंत्रणा राज्य सरकारची असली तरी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात ह्यदिशाह्ण च्या माध्यमातून पाठपुरावा करत राहू, असे सांगून काही विभागांच्या कामांबद्दल नाराजीदेखील व्यक्त केली. यावेळी अधिकारी, शिवसेना पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.