शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षामुळे बुलडाणा जिल्ह्यात ७९१ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 15:04 IST

गत वर्षभरात जिल्ह्यात ७९३ बालकांचे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: आर्थीक व दुर्बल घटकासह आदीवासी भागातील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असतानाही गत वर्षभरात जिल्ह्यात ७९३ बालकांचे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर किती खर्च केल्या जातो हा संशोधनाचा विषय बनला आहे.जागतिक आरोग्य संस्थेच्या (डब्लू.एच.ओ) निर्देशानुसार संपूर्ण देशात गर्भवती महिला व नवजात शिशूंच्या आरोग्यासाठी विविध योजना कार्यान्वीत केल्या जातात. त्यावर युनिसेफ कडून कोट्यवधी रुपये निधी सुद्धा मिळतो. सध्या देशातील प्रत्येक गावात राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांकडे गर्भवती महिला, नवजात शिशूंच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याची जबाबदारी असते. याशिवाय जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभागामार्फत सुद्धा महिलांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र कुठेतरी योजना राबविण्यात दिरंगाई होत असल्याने ऐन शेवटच्या क्षणी गर्भवती महिलेचा किंवा नवजात बालकाचा मृत्यू होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील तीन वर्षात एकूण २ हजार ४०६ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आदीवासी भागातील कुपोषण मुक्तीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत वेगवेगळ््या योजना राबविल्या जातात. याशिवाय आदिवासी विभागामार्फत सुद्धा कोटयावधी रुपये कुपोषणासह बालकांचा आरोग्याचा दर्जा सुधारल्या जावा यासाठी खर्च करते. असे असतानाही ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक असल्याचे दिसून येते. प्रसुतीसाठी मातेला रुग्णालयात आणताना माता व बालमृत्युचे प्रमाण सुद्धा तेवढेच गंभीर आहे. फक्त अहवालापुरतेच नवजात शिशूंंच्या मृत्यूचे प्रमाण उरले असल्याची शोकांतिका आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव