शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

७५ गावे पाणीटंचाईच्या उंबरठय़ावर

By admin | Updated: November 6, 2014 23:13 IST

संग्रामपूर व जळगाव तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान, संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार.

संग्रामपूर (बुलडाणा) : यंदाच्या पावसाच्या हुलकावणीमुळे सरासरीपेक्षा जळगाव जामोद उ पविभागात पर्जन्यमान कमी झाल्याची नोंद आहे. परिणामी भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होणार, त्यानुसार दोन्ही तालुक्यातील पंचायत समितीकडून संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. आ.डॉ.संजय कुटे यांनीही आढावा घेऊन आकडेवारी घे तली.जळगाव जामोद आणि संग्रामपूर या दोन तालुक्यात एकूण ७५ गावांमध्ये विविध उपाय योजना करण्याबाबत अहवालात नमूद आहे. पैकी जळगाव पंचायत समितीमधील ३५ गावे तर संग्रामपूर पंचायत समितीमधील ४0 गावांचा समावेश आहे. दोन्ही तालुक्यातील गावे खारपाणपट्टय़ात येत असल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी स्रोत मोजकेच आहेत. क्षारांचे प्रमाण पाहता र्मयादीत खोलीपर्यंतचे पाणी वापरात घेता येते. पाऊस पडल्यानंतर पाणी अडविण्याची सक्षम व्यवस्था या भागात नाही म्हणून उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भव त आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळी झपाट्याने खोल जाते. त्यामुळे गरजेनुसार पाणी पुरवठा होऊ शकत नाही. या बाबी लक्षात घेऊन पंचायत समितीच्या पाणीटंचाई कक्षाकडून नियोजन तयार करून प्रशासनाकडे सादर करण्यात आले. जळगाव जामोदमध्ये पाणीटंचाई भासणारे २१ गावे आहेत. ज्यामध्ये करणवाडी खु., करणवाडी बु., बोराळा बु., निंभोरा बु., गोळेगाव बु., गोळेगाव खु., सावरगाव, मडाखेड बु., वडशिंगी, बोराळा खु., चावरा, सुकळी, पिंप्री खोद्री, पळशी वैद्य, पळशी घाट, मोहिदेपूर, पळशी सुपो, नाव खुर्द, झाडेगाव, सुलज, काजेगाव आदींचा समावेश आहे. तर संग्रामपूरमध्ये ४0 गावांमध्ये ४0 उपाययोजना करण्याचा प्रस्ताव आहे. ज्यामध्ये सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण (४), खासगी विहिरीचे अधिग्रहण (१६), नळयोजना विशेष दुरूस्ती (४), नवीन विंधन विहिरी करणे (१८) चा समावेश आहे.