शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

लाेणार तालुक्यात ७० टक्के पेरणी आटाेपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

लोणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जाेरदार पावसामुळे ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी आटाेपली आहे़ गत काही ...

लोणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जाेरदार पावसामुळे ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी आटाेपली आहे़ गत काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़ आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखीच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोणार तालुक्यातील कृषी हंगाम हा शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असते. लोणार तालुक्यात सुमारे ३६ हजार शेतकरी असून या सर्व शेतकरी कुटुंबीयांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पेरणीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहीत धरून अनेक शेतकऱ्यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला.

जून महिन्यात झालेल्या पहिल्या दमदार पावसानंतर अधून-मधून पावसाचा शिडकावा झाला. परंतु, पिकांना पोषक पाऊस झाला नाही. पंधरा दिवसांपासून तर हा पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे पिके धोक्यात सापडली आहेत. यावर्षी तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनला लागवडीला प्राधान्य दिले आहे. सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर आणि मुगाची पेरणीही झाली आहे. परंतु, पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. मागील १५ दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे. परंतु, पाऊसच पडत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाचा बळी ठरत आहेत. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या ही पिके तग धरून आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यावर ओढवू शकते.

४० हजार हेक्टवर साेयाबीनची पेरणी

तालुक्यात गत वर्षी ४० हजार ९३ हेक्टरवर साेयाबीनची पेरणी झाली हाेती़ यावर्षी ४० हजार १०२ हेक्टरवर साेयाबीनची पेरणी हाेणार असल्याचा अंदाज कृषी विभागने व्यक्त केला आहे़ त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटाेपली आहे़ तसेच कापूस २ हजार ६८० हेक्टर, तूर ७ हजार ४१२ हेक्टर, मूग एक हजार ४३३ हेक्टर आणि उडीद १ हजार ४७० हेक्टरवर पेरणी हाेणार आहे़ पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे डाेळे आभाळाकडे लागले आहेत़