शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

लाेणार तालुक्यात ७० टक्के पेरणी आटाेपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

लोणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जाेरदार पावसामुळे ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी आटाेपली आहे़ गत काही ...

लोणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जाेरदार पावसामुळे ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी आटाेपली आहे़ गत काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़ आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखीच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोणार तालुक्यातील कृषी हंगाम हा शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असते. लोणार तालुक्यात सुमारे ३६ हजार शेतकरी असून या सर्व शेतकरी कुटुंबीयांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पेरणीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहीत धरून अनेक शेतकऱ्यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला.

जून महिन्यात झालेल्या पहिल्या दमदार पावसानंतर अधून-मधून पावसाचा शिडकावा झाला. परंतु, पिकांना पोषक पाऊस झाला नाही. पंधरा दिवसांपासून तर हा पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे पिके धोक्यात सापडली आहेत. यावर्षी तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनला लागवडीला प्राधान्य दिले आहे. सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर आणि मुगाची पेरणीही झाली आहे. परंतु, पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. मागील १५ दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे. परंतु, पाऊसच पडत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाचा बळी ठरत आहेत. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या ही पिके तग धरून आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यावर ओढवू शकते.

४० हजार हेक्टवर साेयाबीनची पेरणी

तालुक्यात गत वर्षी ४० हजार ९३ हेक्टरवर साेयाबीनची पेरणी झाली हाेती़ यावर्षी ४० हजार १०२ हेक्टरवर साेयाबीनची पेरणी हाेणार असल्याचा अंदाज कृषी विभागने व्यक्त केला आहे़ त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटाेपली आहे़ तसेच कापूस २ हजार ६८० हेक्टर, तूर ७ हजार ४१२ हेक्टर, मूग एक हजार ४३३ हेक्टर आणि उडीद १ हजार ४७० हेक्टरवर पेरणी हाेणार आहे़ पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे डाेळे आभाळाकडे लागले आहेत़