शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

६३ हजार हेक्टरवरील पिके बाधित!

By admin | Updated: October 13, 2016 02:16 IST

परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश.

खामगाव, दि. १२- सतत तीन वर्षापासून अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणार्‍या बळीराजाला यावर्षी परतीच्या पावसाने फटका दिला आहे. परतीच्या पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ६३ हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याची माहिती असून प्रशासनाने पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. गत तीन वर्षांमध्ये खरीपातील पेरणीसाठी मृगनक्षत्रात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने अनेक शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली होती. गत वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतवृष्टीमुळे मुग, उडीद, सोयाबीन आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यासह जाणकारांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी मृग नक्षत्रामध्येच खरीपाची पेरणी केली. सुरुवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने २0 दिवसाची उघडीप दिली. त्यामुळे मुग, उडीद आणि सोयाबिन या तिन पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोयाबिन काढणीच्या हंगामातच परतीचा पाऊस बरसल्याने सोयाबिन पिकाचे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबिनला कोंब फुटले असून मातीमिश्रीत सोयाबिनच शेतकर्‍यांच्या पदरी पडत आहे. महसूल विभागाने नुकसानाची माहिती घेतली असता जिल्ह्यातील ५१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, तर १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये मुग, उडीद, सोयाबिन आणि तिळ या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यानुसार आता नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्रिसदस्यीय समिती करणार पंचनामे-पिकांच्या नुकसानाचे पंचनामे त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात येणार आहे. कृषीसेवक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून पीक नुकसानाचे पंचनामे केले जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी शासनाला हि माहिती पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या माहितीच्या आधारे विमा कंपनी देखील शेतकर्‍यांना नुकसानीचा लाभ देणार आहे. नुकसानाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता-महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तीन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणी नंतर जिल्ह्यातील नुकसानाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून, प्रशासनाने सर्वेक्षणाचे काम तातडीने करावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.