शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

सायबर सेलकडे ६२ तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST

कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सरकारच्या वतीने प्राेत्साहन देण्यात येत आहे. तसेच विविध ॲपच्या माध्यमातून नागरिकही ऑनलाईन व्यवहार माेठ्या प्रमाणात करीत ...

कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सरकारच्या वतीने प्राेत्साहन देण्यात येत आहे. तसेच विविध ॲपच्या माध्यमातून नागरिकही ऑनलाईन व्यवहार माेठ्या प्रमाणात करीत आहेत. गत काही दिवसांपासून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातून फेक अकाऊंट काढून पैसे मागण्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आले हाेते. तसेच बँकेतून बाेलत असल्याची बतावणी करून अनेकांनाकडून एटीएमची माहिती व पासवर्ड विचारून फसवणूक करण्यात येत आहेत. काही जणांना कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात येत आहे. कमकुवत पासवर्ड असल्याने, तसेच लाेभापायी अनेकजण फसविले जात असल्याचे चित्र आहे. सायबर सेलसह बँकांही वारंवार आवाहन करीत असले तरी भामट्यांनी केलेल्या काॅलवर अनेकजण माहिती देऊन फसवणूक करीत आहेत. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. सायबर सेलकडे कामाचा वाढता व्याप पाहता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

फेसबुकवर फसविल्याच्या सर्वाधिक तक्रारी

फेसबुकवर एखाद्याच्या नावाने बनावट अकाउंट काढून त्याच्या मित्रांना पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत. या संदर्भात सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच एटीएमची माहिती विचारून फसवणूक, कमी व्याजदराचे आमिष दाखवून फसवणूक, आदी वाढले आहे. आमिषाला बळी पडल्याने अनेकांची फसवणूक हाेत असल्याचे चित्र आहे. बँकांनी १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास संदेश पाठविण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

पासवर्ड कमकुवत ठेवू नये

अनेकजण आपल्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर ॲपचा वापर करताना पासवर्ड साेपा ठेवतात. अनेकजण आपला माेबाईल क्रमांकच पासवर्ड ठेवतात. हॅकर्ससाठी असे पासवर्ड शाेधने साेपे जाते. त्यामुळे कुठल्या ॲपचा वापर करताना साेपा पासवर्ड ठेवू नये, असे आवाहन सायबर सेलने केले आहे. जिल्ह्यात सन २०२० मध्ये एकूण ६२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

कुठल्याही आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. कमी व्याजदाराने कुणीही कर्ज देत नाही. तसेच आर्थिक व्यवहारासाठी विविध ॲप वापरताना त्यांचा पासवर्ड साेपा ठेवू नये. आपली आर्थिक फसवणूक हाेऊ नये, यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे. कुठल्याही बनावट काॅलला उत्तर देऊ नका, आपल्या बँक खाते आणि एटीएमची माहिती कुणालाही देऊ नका. फसवणूक झाल्यास सायबर सेलकडे तातडीने तक्रार करा.

अरविंद चावरीया, पाेलीस अधीक्षक, बुलडाणा