शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात आरटीईच्या ६० टक्के जागा भरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST

शाळांचे पैसे कधी येणार राज्य शासनाने मागील तीन वर्षांपासून आरटीई परताव्याची रक्‍कम शाळांना दिलेली नाही, त्यामुळे ही रक्‍कम कधी ...

शाळांचे पैसे कधी येणार

राज्य शासनाने मागील तीन वर्षांपासून आरटीई परताव्याची रक्‍कम शाळांना दिलेली नाही, त्यामुळे ही रक्‍कम कधी मिळणार, असा प्रश्‍न शाळांना पडला आहे. ही रक्‍कम देण्यात यावी, अशी मागणी खासगी शाळा संघटनांमधून करण्यात आली आहे.

दुसऱ्यांदा मुदत वाढ

आरटीई प्रवेश घेण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली आहे. जूनमध्ये शाळा प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवेश घेण्यासाठी २० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. त्यांतर शाळेत प्रवेश घेण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुुदत होती. आता २३ जुलैपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे, त्यांनी २३ जुलै २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा. आरटीई प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी नंबर लागलेल्या संबंधित शाळेतच प्रवेश घ्यावेत.

सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक.

आरटीई अंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंद - २३१

एकूण जागा - २१४२

आतापर्यंत झालेले प्रवेश - १३०२

शिल्लक जागा - ८४०

पालकांच्या अडचणी काय?

खासगी विनाअनुदानित शाळांना राज्य सरकारने आरटीई परताव्याची रक्‍कम दिलेली नाही. त्यामुळे शाळा प्रवेश देण्यासाठी काही शाळा टाळाटाळ करीत आहेत. परिणामी प्रवेश घेण्यासाठी पालकांना त्रास होत आहे. मात्र शाळा प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार करण्यास पालक समोर येत नाहीत.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी....

प्रतीक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता शाळेत जाऊ नये. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, उर्वरित रिक्त जागा करिता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. त्यांच्या करिता आरटीई २५ टक्के पोर्टलवर स्वतंत्र सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.