शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बुलडाण्याच्या स्मशानभूमीत २० दिवसात ६० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

प्रत्यक्ष स्मशानभूमीमध्ये आणलेल्या पार्थिवांच्या नाेंदी पाहता ही बाब स्पष्ट झाली आहे. या ६० मृत्यूंपैकी कोरोनामुळे नेमके किती मृत्यू झाले ...

प्रत्यक्ष स्मशानभूमीमध्ये आणलेल्या पार्थिवांच्या नाेंदी पाहता ही बाब स्पष्ट झाली आहे. या ६० मृत्यूंपैकी कोरोनामुळे नेमके किती मृत्यू झाले आहेत हे स्पष्ट होत नसले तरी बोथारोडवरील हिंदू स्मशानभूमीत जागा कमी पडत असल्याचे चित्र आहे. येथील स्मशानभूमीत पार्थिवाच्या दहनासाठी चार पिंजरे आहेत. मात्र त्या स्मशानभूमीतील मुख्य अंत्यविधीच्या जागेव्यतिरिक्त परिसरात लगतच जागोजागी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे स्पष्ट जाणवत आहे. बुधवारी प्रत्यक्ष स्मशानभूमीत पाहणी केली असता जवळपास सहा पार्थिंवार गेल्या २४ तासात अंत्यसंस्कार करण्याच आले असल्याचे स्पष्ट दिसत होते. तर दोन चिता अद्यापही जळत असल्याचे समोर आले. स्मशानभूमीमधील मृतांच्या नोंदणी बुकाची पाहणी केली असता त्यात १ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान ६० जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच्या नोंदी समोर आल्या आहेत. त्यामुळे बुलडाण्याची एकंदरीत स्थिती आता बिकट होते की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. स्मशानभूमीतील मुख्य अंत्यसंस्काराच्या जागेवरील चार पिंजऱ्यांलगतच जेथे जागा मिळेल तेथे मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे स्पष्ट जाणवत होते.

--सहा दिवसात ४० मृत्यू--

बुलडाणा जिल्ह्यात कडक निर्बंध व रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर २१ एप्रिलपर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ एकाचा मृत्यू झाला होता. हा अपवाद वगळता १४ एप्रिलपासून आजपर्यंत सातत्याने कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.