शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

५९३ इच्छुक ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च आयोगाने दिलेल्या मुदतीच्या आत सादर न केल्यामुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च आयोगाने दिलेल्या मुदतीच्या आत सादर न केल्यामुळे जिल्ह्यातील ५९३ इच्छुकांना यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लढता येणार नाही.

गेल्या वेळचा निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे १२ मे २०१६ रोजी या उमेदवारांना तत्कालीन जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. त्यामुळे सध्या होत असलेल्या जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत या उमेदवारांना रिंगणात उतरता येणार नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागातील अनेक जणांना या नियमाची माहितीच नसल्याने त्यांना गेल्यावेळी या निर्णयाचा फटका बसला होता.

वास्तविक निवडणूक आयोगाने ६ मे २०१० रोजीच अनुषंगिक एका पत्रकान्वये यासंदर्भात सूचित केलेले आहे. परिणामी यंदाच्या निवडणुकीत ५९३ जण निवडणूक लढवू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे गेल्यावेळी एकट्या खामगाव तालुक्यातील १०० तर संग्रामपूरमधील ११८ उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्चच सादर केला नव्हता. त्यामुळे यंदाची ग्रामपंचायत निवडणूक व पोटनिवडणूक लढविण्यास ते अपात्र ठरले आहेत.

सदस्यसंख्येनुसार खर्च

७ ते ९ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवाराला २५ हजार रुपये निवडणूक खर्च मर्यादा आहे. ११ ते १३ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या उमेदवाराला ३५ हजार रुपये तर १५ ते १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ५० हजार रुपयापर्यंत निवडणुकीचा खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. निवडणूक संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो.