शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमदनगरमध्ये  अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:38 IST

कंत्राटदाराकडून कोणतीही मदत होत नसल्याने या मजुरांना हालअपेष्टा सहन करावी लागत आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू संक्रमनामुळे सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे राज्यासह परराज्यातील स्थलांतरीत मजुरांची चांगलीच परवड होत आहे. महाराष्ट्रातील मजूर दुसºया राज्यात तर परराज्यातील मजूर महाराष्ट्रात अडकले असतानाच,  खामगाव तालुक्यातील ५१ स्थलांतरीत मजूर अहमदनगर येथे अडकल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कंत्राटदाराकडून कोणतीही मदत होत नसल्याने या मजुरांना हालअपेष्टा सहन करावी लागत आहे.कोरोना विषाणू संक्रमनामुळे २३ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. या लाकडाउनमुळे राज्यातील विविध ठिकाणी स्थलांतरीत मजूर अडकून पडले असून, खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमद नगर येथील दरेवाडी मिल्ट्री कॅम्प, एमआयडीसी गेट नं.३ परिसरात गत ४० दिवसांपासून अडकलेत. त्यांच्या जवळची सर्वच संसाधन संपल्याने या मजुरांचे चांगलेच हाल होत असल्याने आमची सोडवणूक करा!, अशी प्रार्थना या मजुरांकडून केली जात आहे. गत अनेक दिवसांपासून त्रस्त झालेल्या या मजुरांनी रविवारी सकाळी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून खामगाव येथे आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.खामगाव तालुक्यातील विविध गावातील स्थलांतरीत मजूर तसेच कामगार मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, सुरत आणि अहमदाबाद येथे वास्तव्यास आहेत. लॉकडाउनमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेक मजुरांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशातच पोटाची खळगी भरण्यासाठी खामगाव तालुक्यातून अहमदनगर येथे गेलेले ५१ मजूर अचडणीत सापडले आहेत.स्थानिक प्रशासनाशी संपर्क होत नसल्याने या मजुरांचे गत काही दिवसांपासून चांगलेच हाल होत आहेत. मिल्ट्री कॅम्प सोडल्यानंतर त्यांना पुन्हा तेथे प्रवेशांची अडचण निर्माण होईल. त्यामुळे  अडकलेले मजूर चांगल्याच द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. कंत्राटदाराने सोडले वाºयावर!खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमद नगर येथील मिल्ट्री कॅम्पच्या निर्माणासाठी गेले होते. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कंत्राटदार तेथून निघून गेला. कोणतीही मदत मिळत नसल्याने या मजुरांची उपासमार होत आहे. खामगाव तालुक्यातील रमेश खंडारे, गणेश खंडारे, वंदना खंडारे, गोविंदा इंगळे, शितल वानखेडे, अनंत मेढे, रजनी मेढे, सुधाकर इंगळे, प्रतिभा इंगळे, तेजराव धुरंधर, ललीता धुरंधर, संजय बाम्हदे, मंदा बाम्हदे, जगन्नाथ सुरडकर, अनिता सुरडकर, मिठाराम खंडारे, मनकर्णा खंडारे, शालीग्राम हेलोडे, शशीकला हेलोडे, प्रकाश तायडे, राजू विरघट, सुरज इंगळे, भास्कर इंगळे, अशोक वाकोडे, शिला वाकोडे, श्रीकृष्ण इंगळे, रोशन वाकोडे, गौतम लांडगे, अनिता लांडगे, मुकिंदा सावळे, प्रतिभा सावळे,मंगेश तेलंग, सविता तेलंग, आराध्या तेलंग, अशोक गवई, रंजना गवई, सिध्दार्थ इंगळे, सिमा इंगळे, तुलशीराम भोसले, संजय खंडारे, जिवन इंगळे, श्रीकांत वानखडे, अतुल गायकवाड,मिलींद वानखेडे, दिलीप इंगळे, जनार्धन वानखडे, सुहानी मेढे, देविका मेढे, ऋतुजा इंगळे, सृष्टी खंडारे आदी स्थलांतरीत मजूर आणि त्यांचे कुटुंबिय फसले आहेत.

 शंकर नगर, खामगाव येथील  प्रकाश तायडे यांनी मोबाईलवर अहमदनगर येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये अडकल्याची माहिती दिली. मजुरांचे आधारकार्ड  आणि त्यांची नावे आणि फोटो पाठविले आहेत. खामगाव येथे परत आणण्यासाठी मदतीची अपेक्षा केली आहे. त्यानुसार खामगाव तालुका प्रशासनाशी संपर्क साधला आहे.-जसवंतसिंग शिखसामाजिक कार्यकर्ता, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावLabourकामगारAhmednagarअहमदनगर