खामगाव : वन्यजीवप्रेमींना खुणावणारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीची गणना रविवारी होणार असून, ज्ञानगंगा अभरण्यात ५0 मचाण टेहळणीसाठी उभारण्यात आले आहेत. ८ नैसर्गिक पाणवठय़ांसह २८ कृत्रिम पाणवठय़ांवर ही गणना होईल. वन्यजीव विभाग व वनविभाग या दोन्ही खात्यातर्फे केल्या जाणार्या या गणनेत दरवर्षी निसर्गप्रेमींना सामील केले जाते. दरवर्षी हौशी निसर्गप्रेमींची संख्या वाढतच आहे. मात्र अनेकांकडून कळत-नकळत जंगलाचे नियमांचे उल्लंघन होऊन गणनेत अडथळा निर्माण होतो. मनुष्याच्या हालचाली, कपडे, आवाजाची चाहूल आल्याने प्राणी पाणवठय़ावर येणे टाळतात, त्यामुळे प्राणी गणनेसाठी अडचणी येतात. त्यामुळे वन्यप्रेमींनी काळजी घेणे आवश्यक आहे.
५0 मचाणांवरून होणार टेहळणी
By admin | Updated: May 4, 2015 01:13 IST