शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अनलॉकनंतरही ५० टक्के एसटी बस आगारातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांमुळे एसटीची चाकेही थांबली होती. ७ जूनपासून निर्बंधामध्ये शिथिलता आल्याने एसटी बस पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांमुळे एसटीची चाकेही थांबली होती. ७ जूनपासून निर्बंधामध्ये शिथिलता आल्याने एसटी बस पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ७ जूनपासून जिल्ह्यातील सात आगारांमधून लांब पल्ल्याच्या ४६ बस सोडण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागातून लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बस दिवसाला जवळपास २६ हजार कि.मी. अंतर कापण्याचे नियोजन सुरुवातीला करण्यात आले होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने लांब पल्ल्याच्या बस बंद करण्यात आल्या होत्या. केवळ जिल्ह्यांतर्गत बसच सुरू होत्या. त्यातही २२ प्रवाशी आल्यानंतरच बसे पुढे जात होती. त्यामुळे प्रवाशांनीही बसकडे पाठ फिरवल्याने एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यात बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एसटी बसही आता पूर्ण क्षमतेने सोडण्यात येत आहे. परंतु ग्रामीण प्रवाशी पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नसल्याने अनेक बस अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. आगारात जवळपास ५० टक्के बसच सुरू आहेत.

एकूण बस - ९०

सध्या सुरू असलेल्या बस - ४५

आगारातच उभ्या बस - ४५

एकूण कर्मचारी - ४२५

चालक - १५०

वाहक - १७५

सध्या कामावर चालक - १५०

सध्या कामावर वाहक - १७५

बस कधी सुरू होणार?

ग्रामीण भागात प्रवाशी मिळत नसल्याने अद्यापही अनेक गावांत बस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. सध्या बुलडाणा आगारातून ग्रामीणमध्ये सैलानी, धाड, चिखली पेठमार्गे, उंद्री, मढ ते धाड या भागात बस सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, अनेक गावांतील प्रवाशांमधून बस कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रवाशांना खासगी गाड्यांचाच आधार

ज्या गावांना गाड्या नाहीत किंवा कमी संख्येने आहेत, अशा ठिकाणी जाण्यासाठी खासगी गाड्यांचाच आधार घ्यावा लागत आहे. एसटी महामंडळाला किमान २० ते २२ प्रवाशी आवश्यक आहेत. परंतु ग्रामीण भागात जाण्यासाठी एवढे प्रवाशी मिळत नसल्याने बस सोडणे अवघड होते.

काय म्हणतात प्रवास करणारे

मी अकोल्यावरून बुलडाणा बसने आलो. परंतु येथून आता गावात जाण्यासाठी बस मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे खासगी वाहनच करावे लागणार आहे.

गजानन जाधव.

लांब पल्ल्याच्या बस सोडण्यात येत आहेत. परंतु गावात जाण्यासाठी बस मिळत नाही. प्रवाशी नसल्याने बस जाऊ शकत नसल्याचे एसटी महामंडळाच्या चौकशी विभागातून सांगण्यात येते.

अमोल पाटील.