शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

४५० गावं पाण्यापासून वंचित

By admin | Updated: April 8, 2017 02:12 IST

जिल्हा सांख्यिकी अहवाल : पिण्याच्या पाणीपुरवठ्याची सुविधा नाही!

बुलडाणा : पाच वर्षांपासून बुलडाणा जिल्हा दुष्काळसदृश परिस्थितीच्या छायेत आहे. यामुळे शेतातील पिकांसह नागरिकांचीही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात १४४४ गावे असताना, यापैकी केवळ ९८९ गावांत पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी सुविधा असून, उर्वरित ४५० गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याची बाब जिल्हा सांख्यिकी अहवालातून पुढे आली आहे.काही वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प झाले असून, शहरासह बऱ्याच ग्रामीण भागात पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. आजरोजी जिल्ह्यात २८७ गट ग्रामपंचायत व ५८० स्वतंत्र्य ग्रामपंचायती कार्यरत आहेत. या ग्रामपंचायतींमधून कार्यरत पाणीपुरवठा योजनेतून जिल्ह्यातील ९८९ गावांना पिण्याचे पाणी पुरविल्या जात आहे. शिवाय उपलब्ध पाण्यातून इतर गरजाही पूर्ण करण्यात येतात. मात्र, असे असतानाही बरेच गावं आजही पाण्यापासून वंचित आहेत.जिल्हा सांख्यिकी अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण १४४४ गावांपैकी ९८९ गावांत पिण्याच्या पाण्याची उपाययोजना आहे, तर उर्वरित ४५० गावांत पुरवठ्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विहीर, हातपंप, नदी आदी पाणी स्रोताचा पाण्यासाठी आधार घ्यावा लागत आहे. आज पाणीटंचाईमुळे बऱ्याच गावांचे पाणी स्रोत प्रभावित झाले आहेत. अनेक गावांतील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागत आहे. ग्रामीण भागातील स्थिती भयंकर असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या प्रारंभीपासूनच पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन आतापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकणार आहे. ६५० गावांत संभाव्य पाणीटंचाई यंदा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला, मात्र आॅक्टोबर २०१६ नंतर पावसाने पाठ फिरवली, शिवाय पाण्याचा वापरही वाढला. यामुळे उन्हाळा सुरु होण्याआधीच जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. जिल्हा प्रशासनाने २०१६-१७ साठी तयार केलेला पाणीटंचाई निवारण आराखड्यानुसार जिल्ह्यात ६५० गावांत संभाव्य पाणीटंचाई घोषित केली आहे.चार गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट जाणवायला सुरुवात झाली असून, चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षीच उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कोणत्याही प्रकारच्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे यावर्षीही पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील चार गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये दे.राजा तालुक्यातील पाडळी शिंदे गावाचा समावेश आहे. तसेच खामगाव तालुक्यातील निरोड व शिराळा, सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी गावाचाही समावेश आहे. पाडळी शिंदे गावची लोकसंख्या २५०० असून, गावाकरिता २४ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर दिवसातून तीन फेऱ्या मारणार आहे. निरोडच्या १७०९ लोकसंख्येसाठी २४ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर दिवसातून तीन फेऱ्या मारणार आहे. त्याचप्रमाणे शिराळा येथील १६०९ लोकसंख्येकरिता याच क्षमतेचा एक टँकर तीन फेऱ्या दिवसातून मारणार आहे. तसेच सोनोशी येथील ३९०० लोकसंख्येसाठी २४ मेट्रिक टन क्षमतेचे दोन टँकर दिवसातून दोन फेऱ्या मारणार आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित गावांना वेळोवेळी भेटी देऊन टँकरच्या खेपांची नोंद तपासावी. तसेच ग्रामपंचायतीने नोंद व्यवस्थित घ्यावी, टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.