बुलडाणा : मागील ३0 जूनपर्यंंंत शंभर टक्के पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले असताना आतापर्यंंत केवळ ४२३ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टांच्या ३४ टक्के आहे. आता पुन्हा कर्जवाटपाला मुदतवाढ दिली असून, १५ जुलैपर्यंंंत उद्दिष्टपूर्ती करण्यात येईल, असा अशावाद अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक पी.एम. शेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील अग्रणी बँकेच्या सभागृहात ३ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यातील ७८ हजार ८४८ शेतकर्यांना १२५0 कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट ३0 जूनपर्यंंंत पूर्ण करायचे होते.; मात्र खासगी तसेच शासकीय बँकांनी शेतकर्यांना पीक कर्ज वाटपाबद्दलची दाखविलेली अनस्था यामुळे उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही. यासंदर्भात महिती देताना शेंडे म्हणाले की, ज्या बँकांनी उद्दिष्टपूर्ती केली नाही त्या बँकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी ३७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यावेळी ५१ टक्के वाटप झाले होते. यावर्षी किमान ६0 टक्के वाटप होईल, यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले.
*सर्वाधिक वाटप विदर्भ कोकण बँक
आतापर्यंंत सर्वाधिक पीक कर्जवाटप विदर्भ कोकण बँकेने केले. बँक ऑफ इंडियाने ३0 टक्के, बँक ऑफ बडोदा ३५ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ३१ टक्के, स्टेट बँके ने ३४ टक्के आणि सेंट्रल बँकेने ३५ टक्के कर्ज वाटप केले. तर विदर्भ कोकण बँकेने सर्वाधिक ४९ टक्के वाटप केले. इतर बँकेने मात्र जेमतेम २0 टक्क्यांपर्यंंतच वाटप केल्याची माहिती शेंडे यांनी दिली.
*पुनर्गठन केवळ १४२ कोटींचे
जिल्ह्यातील ७८ हजार ८४८ शेतकर्यांपैकी आतापर्यंंत २४ हजार २२९ शेतकर्यांच्या १४२.२९ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे बँकांनी पुनर्गठन केले. तर ६४ हजार ६१९ शेतकर्यांनी आपल्या कर्जाचे नूतनीकरण केल्याची माहिती पी.एम. शेंडे यांनी दिली. वास्तविक पुनर्गठन यापेक्षा जास्त करावयास हवे होते; मात्र बँका तेही पूर्ण करू शकल्या नाही.