शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

मेहकरात ४0 टक्के अतिक्रमण

By admin | Updated: July 12, 2014 00:14 IST

मेहकर मुख्याधिकार्‍याने ओढले नगराध्यक्षांवर ताशेरे.

मेहकर : मुख्याधिकार्‍यांनी नगराध्यक्षावर अनेक कामांबाबत ताशेरे ओढत शहरात तब्बल ४0 टक्के अतिक्रमणाचा विळखा असल्याचा गौप्यस्फोट केला. आता सुधारित पाणीपुरवठा योजनेतून दिवसाकाठी प्रती व्यक्ती १३५ लीटर पाणी देण्यात येणार असल्याचे सूतोवाचही मुख्याधिकारी तानाजी घोलप यांनी केले. मेहकर न.प.च्या सभागृहात गुरुवारला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील अतिक्रमणासंदर्भात ते म्हणाले की, शहरात ४0 टक्के क्षेत्रावर अतिक्रमण असून, लोकप्रतिनिधीनेसुद्धा मोठय़ा प्रमाणावर इमारती उभ्या केल्या आहेत. गत तीन महिन्यांचे न.प. कर्मचार्‍यांचे वेतन थकीत असून, सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे २ कोटी ६५ लाख रुपये थकीत आहेत. तर १३ जणांचे उच्च न्यायालयात प्रकरण सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे होत असून, काही ठिकाणी कामे चुकीचे झाले असेल, तर ते परत ठेकेदाराकडून पूर्ण करून घेणार असून, सत्ताधारी नगराध्यक्षांनी माझ्या स्वत:च्या जीपीएफची रक्कम ऑक्टोबर ते मार्च २0१४ पर्यंतच्या पगारातून कपात करून भरली नसल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाने गरिबांसाठी ५५ एकर जमीन घेऊन ४७ कोटी रुपयांची १५८४ घरकुले मंजूर केली. यामध्ये १७ कोटी रुपये न.प.ला प्राप्त झाले असून, १२ कोटी ४७ लाख रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले. १५८४ पैकी ११00 घरकुलांचे बांधकाम पूर्ण होऊन १ हजार ३0८ घरकुले प्रगतिपथावर आहे त. मंजूर झालेल्या लाभार्थ्यांमध्ये काही चुका असल्याच्या तक्रारी आल्याने चुकीचे नाव रद्द करून स्वत: जिल्हाधिकारी योग्य लाभार्थ्यांंची निवड करणार आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहू देणार नाहीत. मेहकर न.प.ही विदर्भात सर्वाधिक घरे बांधून देणारी एकमेव नगर परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. मेहकर नगर परिषदेने केलेल्या न.प. इमारतीच्या दुसर्‍या माळ्याचे काम चुकीचे असून, आपण स्वत: वर्क ऑर्डर दिले नाही व त्या कामाचे बिलही देण्यात येऊ नये, अशी शिफारस जिल्हाधिकार्‍यांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा प्रशासकीय सुधारणा ७४ लाख रुपयांची पूर्ण होऊन पाणीपुरवठा योजना २0 कोटी २३ लाख रुपयांची शासनाकडे अंतीम मंजुरीसाठी आहे. २४ जून २0१४ रोजी मुंबई येथे मंत्रीमंडळाची बैठक रद्द झाल्याने हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. या योजनेमुळे ३२ वर्षापर्यंत म्हणजे २0४६ पर्यंंत प्रती व्यक्ती १३५ लीटर दरदिवशी पाणी मिळणार असून, शासनाकडून ९0 टक्के अनुदान एकूण ७0 कोटी रुपये न.प.ला मिळणार आहेत. न.प.ची स्थापना १९२९ मध्ये झाली; मात्र आजपर्यंंत शौचालयाच्या अद्ययावत पुरेशा सुविधा नव्हत्या. यावर उपाय म्हणून न.प.ने शौचालय मल उपसा यंत्र खरेदी करून नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.