शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

कीटकनाशक फवारणीमुळे ४0 जणांना विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:12 IST

पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना  महिनाभरात सुमारे ४0 जणांना विषबाधा झाल्याची माहिती  लाखनवाडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ.विनोद जाधव यांनी दिली. 

ठळक मुद्देलाखनवाडा परिसरात पिकांवरील फवारणी बनली जीवघेणीकृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज

लाखनवाडा : पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना  महिनाभरात सुमारे ४0 जणांना विषबाधा झाल्याची माहिती  लाखनवाडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ.विनोद जाधव यांनी दिली. गेल्या एक महिन्यात जवळपास ४0 लोकांना कीटकनाशक  फवारणी करताना विषबाधा झाली. त्यापैकी ५0 टक्के  रुग्णांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे हलविण्यात आले.  तर काही रुग्णांना जवळपास ४0 पर्यंत इंजेक्शन द्यावे  लागले. सध्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर  कीटकनाशकांची फवारणी शेतकरी मोठय़ा प्रमाणात करीत  आहेत; परंतु सदर कीटकनाशक फवारणी करताना अंगावर  औषध पडल्यामुळे फवारणी करणार्‍यांना विषबाधा होण्याचे  प्रमाण खूपच वाढले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर हे शे तकर्‍यांचे मुख्य पीक आहे. त्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव  होऊ नये, यासाठी महागडे औषध घेऊन शेतकरी पिकावर  फवारणी करतात; परंतु पीक वाचविण्याच्या नादात शे तकर्‍यांच्याच जीवाला धोका निर्माण होत आहे.यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे;  मात्र पिकावर कीटकनाशकाची फवारणी केल्याशिवाय पर्याय  नाही. अगोदरच अत्यल्प पावसामुळे पिकाचे नुकसान होत  आहे. काही शेतकरी कृषीपंपाद्वारे पाणी देऊन कसेबसे पीक  वाचवित आहेत.  त्यातच अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने  कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक बनलेले आहे;  परंतु कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होत असल्यामुळे  शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 

कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरजविविध पिकांवरील किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी  रासायनिक कीटकनाशके फवारत आहेत; परंतु कीड रोग  सहजासहजी आटोक्यात येत नसल्याने अधिकप्रभावी  कीटकनाशकांचा शोध शेतकर्‍यांकडून घेतला जातो. ही  कीटकनाशके पिकातील अन्नघटकांसोबतच फवारणी  करणारे शेतकरी व शेतमजूर यांच्या जीवासाठीसुद्धा  धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे नेमके कोणते  कीटकनाशक कोणत्या पिकासाठी फवारावे, फवारणी कर ताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात कृषी विभागाच्या  अधिकारी व कर्मचार्‍यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

पिकावरील कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होत  आहे. त्याकरिता कीटकनाशकाची फवारणी करताना  तोंडाला रुमाल बांधून फवारणी करावी व हातात मोजे  घालावे जेणेकरून विषबाधा होण्यापासून बचाव होऊ  शकेल. - डॉ.विनोद जाधव,वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, लाखनवाडा.