शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

मनरेगा अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात ३९५ शेततळी

By admin | Updated: January 26, 2016 02:28 IST

६७ शेततळय़ांचे काम पूर्ण; १९७ शेततळय़ांचे काम प्रगतिपथावर.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा: शेतीला उपयुक्त पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने जलस्रोत वाढविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ३९५ शेततळी मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ६७ शेततळी पूर्ण झाली असून, १९७ शेततळ्यांचे काम सुरू आहे. उर्वरित १३१ शेततळ्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या योजनेमुळे परिसरात असलेल्या गावांतील मजुरांना रोजगार उपलब्ध झाला असून, आतापर्यंत १३७.२१ लाखांचा खर्च यावर करण्यात आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पेरणीच्या सुरुवातीला पावसाने दगा दिला होता. त्यामुळे पेरणी वेळेवर न झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट आली. यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतकर्‍यांना शेततळी घेण्यासाठी प्रोत्साहन देणे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीने किमान पाच शेततळी घेण्याचा सूचना दिल्या आहेत. १0 बाय १0 बाय ३ मीटर, १५ बाय १0 बाय ३ मीटर तसेच १५ बाय १५ बाय ३ मीटर या आकाराचे शेततळे ग्रामपंचायतमार्फत घेण्याची परवानगी शासननिर्णयानुसार देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायत अंतर्गत सन २0१५-१६ या वर्षासाठी ३९५ शेततळी मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ६७ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, १९७ शेततळ्यांचे काम सुरू आहे. यासाठी आतापर्यंत १३७ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या शेततळ्यांमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांना फायदा झाला आहे.