शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी ३८ शाळा पात्र

By admin | Updated: September 28, 2016 01:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातून अंतिम नोंदणी केलेल्या ७८७ शाळांपैकी जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी केवळ ३८ शाळा पात्र ठरल्याची माहिती.

गणेश मापारी खामगाव(जि. बुलडाणा), दि. २७- स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्यातून अंतिम नोंदणी केलेल्या ७८७ शाळांपैकी जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी केवळ ३८ शाळा पात्र ठरल्याची माहिती प्राप्त झाली आहे. समाजामध्ये स्वच्छतेबाबत जागृकता निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न करणारी शाळा, समाजामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीचे उत्कृष्ट काम करणारी शाळा तसेच आरोग्य व स्वच्छतेबाबत इतरांना प्रेरणा देणार्‍या शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे.स्वच्छता गृह, साबणाने हात धुणे, पाण्याची व्यवस्था, ऑपरेशन अँण्ड मेन्टनन्स आणि स्वच्छतेच्या सवयींची रुजवणूक यासाठी एकूण १00 गुण शाळा, विद्यालयांना देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध रंगानुसार शाळांचे गट तयार करण्यात आले आहेत. ३५ पेक्षा कमी गुण घेणार्‍या शाळांसाठी ह्यरेडह्ण गट असून, ३५ ते ५0 ह्यऑरेंजह्ण, ५१ ते ७४ ह्ययलोह्ण, ७५ ते ८९ ह्यब्ल्यूह्ण आणि ९0 ते १00 गुण मिळविणार्‍या शाळा ह्यग्रीनह्ण गटात टाकण्यात येणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक होते. बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या १ हजार ४५७ शाळांपैकी १ हजार १८३ शाळांनी नोंदणी केली होती; मात्र शाळांची सविस्तर माहिती देण्याच्या प्रक्रियेत ३८३ शाळा बाद झाल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जिल्हाभरातून केवळ ७८७ शाळाच राहिल्या. या ७८७ शाळांची तपासणी निरीक्षण समितीने केली असून, जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी केवळ ३८ शाळा पात्र ठरलेल्या आहेत. या ३८ शाळांपैकीही तीन शाळांनी काही निकषांची पूर्तता करणे अद्याप बाकी आहे. १७२ शाळा विषयनिहाय पुरस्कारासाठी पात्रस्वच्छ विद्यालय पुरस्कारामध्ये तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांसोबतच प्रत्येक मुद्यांवर चांगली कामगिरी करणार्‍या शाळांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे. पाणी उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, विद्यार्थी वर्तवणूक बदल आणि वेगवेगळे शौचालय या मुद्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानुसार वेगवेगळ्या विषयांवर चांगले काम करणार्‍या जिल्ह्यातील १७२ शाळा विषयनिहाय पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. आलेख घसरताच स्वच्छ विद्यालय पुरस्कारामध्ये जिल्ह्यातील शाळांच्या सहभागाचा आलेख घसरताच असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील १ हजार ५६३ शाळांपैकी १ हजार १७0 शाळांनी सर्वप्रथम ऑनलाइन नामांकन भरले. अंतिम नामांकनाच्या वेळी यामधील ३८३ शाळा कमी झाल्या. त्यामुळे ७८७ शाळांचाच सहभाग या अभियानामध्ये राहिला. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी आता केवळ ३८ शाळा पात्र झाल्या आहेत. यापैकीही काही शाळांची गळती होणार असून, राज्यस्तरीय पुरस्कारासाठी किती शाळा अंतिम यादीत राहतील, याकडेच आता लक्ष लागले आहे.