शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रब्बीच्या ३७ टक्के पेरण्या!

By admin | Updated: November 18, 2014 23:57 IST

जीवनदान परतीच्या पावसामुळे शेतक-यांना फायदा.

ब्रह्मनंद जाधव / मेहकरराज्यात प्रदीर्घ दडीनंतर परतीचा पाऊस फिरकल्याने रब्बी हंगामातील पिकांना जीवनदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्यात सरासरी २३ लाख ९ हजार ९१0 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३७ टक्के रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये गहू व हरभरा पिकाचा पेरा अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. तर विदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा शेतीला लागलेला खर्चही भरून निघला नाही. खरीप हंगामातील झळ रब्बीत भरून काढण्यासाठी ओलिताची सोय असलेल्या शेतकर्‍यांची रब्बी पिकाची कामे जोमात सुरू आहेत; परंतु, कोरडवाहू क्षेत्रावरील शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी ६२ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यातील सरासरी २३ लाख ९ हजार ९१0 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये मक्याच्या सरासरी ९९ हजार ६00 हेक्टर क्षेत्रापैकी ६५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शाळूचे सरासरी क्षेत्र ३0 लाख ९0 हजार असून, ४५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. हरभरा १३ लाख ६ हजार ८00 हेक्टर क्षेत्र असून, ३५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गव्हाचे सरसरी क्षेत्र ११ लाख ७८ हजार ६00 असून, १0 टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. तर भाजीपाला, भुईमूग, सूर्यफूल, करडी, जवस, वाटाणा व इतर पिकांचे सरासरी ६ लाख ६७ हजार ६00 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ २ लाख ७९ हजार ४३0 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्यासह इतर पेरणी झाली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे लांबलेला खरीप हंगाम व परतीच्या पावसाअभावी रब्बीच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाला आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अनेक शेतकर्‍यांनी पेरणी करण्याचे धाडसच केले नव्हते; परंतु गत तीन ते चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी परतीचा पाऊस फिरकल्याणे शेतकर्‍यांमध्ये आता रब्बी हंगामाची आशा निर्माण झाली आहे. तर बहुतांश ठिकाणी या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला जोमात सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.