शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राज्यात रब्बीच्या ३७ टक्के पेरण्या!

By admin | Updated: November 18, 2014 23:57 IST

जीवनदान परतीच्या पावसामुळे शेतक-यांना फायदा.

ब्रह्मनंद जाधव / मेहकरराज्यात प्रदीर्घ दडीनंतर परतीचा पाऊस फिरकल्याने रब्बी हंगामातील पिकांना जीवनदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्यात सरासरी २३ लाख ९ हजार ९१0 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३७ टक्के रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये गहू व हरभरा पिकाचा पेरा अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. तर विदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा शेतीला लागलेला खर्चही भरून निघला नाही. खरीप हंगामातील झळ रब्बीत भरून काढण्यासाठी ओलिताची सोय असलेल्या शेतकर्‍यांची रब्बी पिकाची कामे जोमात सुरू आहेत; परंतु, कोरडवाहू क्षेत्रावरील शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी ६२ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यातील सरासरी २३ लाख ९ हजार ९१0 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये मक्याच्या सरासरी ९९ हजार ६00 हेक्टर क्षेत्रापैकी ६५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शाळूचे सरासरी क्षेत्र ३0 लाख ९0 हजार असून, ४५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. हरभरा १३ लाख ६ हजार ८00 हेक्टर क्षेत्र असून, ३५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गव्हाचे सरसरी क्षेत्र ११ लाख ७८ हजार ६00 असून, १0 टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. तर भाजीपाला, भुईमूग, सूर्यफूल, करडी, जवस, वाटाणा व इतर पिकांचे सरासरी ६ लाख ६७ हजार ६00 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ २ लाख ७९ हजार ४३0 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्यासह इतर पेरणी झाली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे लांबलेला खरीप हंगाम व परतीच्या पावसाअभावी रब्बीच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाला आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अनेक शेतकर्‍यांनी पेरणी करण्याचे धाडसच केले नव्हते; परंतु गत तीन ते चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी परतीचा पाऊस फिरकल्याणे शेतकर्‍यांमध्ये आता रब्बी हंगामाची आशा निर्माण झाली आहे. तर बहुतांश ठिकाणी या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला जोमात सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.