शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

खंडित कालावधीतील ३७ कुटुंबांना अपघात विम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:36 IST

अंढेरा : विमा कंपनीची मुदत संपल्याने खंडित कालावधी असलेल्या डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या चार महिन्यात अपघाती मृत्यू ...

अंढेरा : विमा कंपनीची मुदत संपल्याने खंडित कालावधी असलेल्या डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या चार महिन्यात अपघाती मृत्यू झालेल्या ३७ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे़

शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्य यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत मदत करण्यात येते. ही याेजना राबविणाऱ्या कंपनीची मुदत संपल्यानंतर नवीन कंपनीची नियुक्ती किंवा जुन्या कंपनीला मुदतवाढ देण्यास शासनाकडून विलंब झाला़ त्यामुळे, १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या चार महिन्यांच्या काल खंडातील कंपनीची नियुक्ती नसल्याने व जुन्या कंपनीचा करार संपल्याने नवीन कंपनी नियुक्तमधील हा कालावधी खंडित म्हणून गणल्या जात आहे. या काळात बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ३७ शेतकरी असून त्यात २० पूर्वसूचना तर १७ प्रस्ताव कृषिविभाग यांच्याकडे प्राप्त आहे़ या ३७ कुटुंबांना अद्यापही मदत मिळाली नाही. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे़

अशी आहेत प्रलंबित प्रकरणे

अपघात विमा योजनेसाठी खंडित कालावधीतील प्रस्तावांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २, चिखली तालुक्यातील ५, मलकापूर मधील २, खामगाव मधील २,शेगाव मधील १, नांदुरा मधील ४, जळगाव जामोद मधील १, संग्रामपूरमधील १, मेहकरमधील १, लोणारमधील ८, देऊळगाव राजा तालुक्यातील ३, तर सिंदखेडराजा तालुक्यातील ७ अशा एकूण ३७ शेतकरी कुटुंबांच्या प्रकरणाचा समावेश आहे़

काेट

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील सर्व प्रस्तावांना शासन स्तरावर लवकरच मंजुरात देण्यात येऊन लाभ देण्यात येईल!

दादासाहेब भुसे, कृषी मंत्री

खंडित कालावधीतील प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येऊन मंजुरी मिळाल्यास त्या कालावधीतील शेतकरी कुटुंबाना लाभ देण्यात येईल.

शंकर टोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.