शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आठवीपर्यंतचे ३.६५ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असून, सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असले तरी याचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. एक वर्षापासून ...

कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असून, सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असले तरी याचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. एक वर्षापासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, कोणतीही परीक्षा न देता उत्तीर्ण होणार आहेत. गतवर्षी २३ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाले होते. मात्र, देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने १७ मार्च २०२० रोजी जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होतात. १७ मार्च रोजी शाळा बंद झाल्यामुळे गतवर्षी परीक्षा होऊ शकल्या नाहीत.

दरवर्षी जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात शाळा सुरू करण्यात येतात. मात्र, यादरम्यान कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. तर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला. शिक्षकांनी पालकांना आवाहन करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. मात्र, जिल्ह्यात बहुतांश शाळा ग्रामीण भागात आहेत. तसेच शहरी भागातही पालकांकडे मोबाइलची व्यवस्था नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा उडाला.

दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण कमी व्हायला लागले. त्यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२१ रोजी आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. पुन्हा शासनाने सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोन महिन्यानंतरच कोरोनाचे रुग्ण आणखी वाढू लागले. त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा दोन महिने तर सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा केवळ २० दिवस सुरू राहल्या. त्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या असून, आता शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

गत एक वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांचे योग्य शिक्षण झाले नाही. त्यामुळे या शैक्षणिक वर्षाबाबत मुलांचे काय होईल, याबाबत चिंता सतावत होती. मात्र, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चिंता मिटली आहे.

- संजय म्हसाळ, पालक.

कोरोनामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून न निघणारे आहे. आता शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या.

- प्रशांत राऊत, पालक.

शिक्षणमंत्र्यांनी १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्वीही होता. फक्त परीक्षा घेण्यात येत होत्या. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे परीक्षा होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार नाही.

- अजय पांडे, पालक.

काय म्हणतात शिक्षणतज्ज्ञ

या शैक्षणिक वर्षात १ ते ४ पर्यंतच्या शाळा उघडल्याच नाहीत तसेच १ ते ८ पर्यंतच्या शाळा केवळ पंधरा दिवस सुरू होत्या. विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण ऑनलाइन देण्यात आले. सध्या कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेणे योग्य नाही. पालकांचीही त्यासाठी संमती मिळाली नसती. कोरोना केव्हा संपेल याबाबत निश्चिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्यच आहे.

- एन.जे. फाळके, शिक्षणतज्ज्ञ.

शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य नाही. दहावी व बारावीचे विद्यार्थीच ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे लहान मुलांना सध्याच्या वातावरणात शाळेत बोलावून परीक्षा घेणे योग्य नाही. शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नसता तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले असते.

- विजयकुमार शिंदे, शिक्षणतज्ज्ञ.