शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

३६ हजार मजुरांच्या हाताला काम!

By admin | Updated: April 11, 2016 01:22 IST

रोजगार हमी योजनेतंगर्त बुलडाणा जिल्ह्यात ८१0 कामांना सुरुवात.

बुलडाणा : सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे शेतातील कामे बंद आहेत. परिणामी शेतमजुरांच्या हाताला काम नाही. कामाच्या शोधात बरेच मजूर जिल्हा सोडण्याचा विचार करीत असताना जिल्हा प्रशासनाकडून रोजगार हमी योजनांची कामे सुरु करण्यात आली आहेत. यामुळे जवळपास ३६ हजार २४६ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. नरेगा अंतर्गत होणार्‍या कामासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनुदान दिले जाते. याबाबत प्रत्येक आठवड्यात होणार्‍या कामाची माहिती घेतली जाते. यानंतर मजुरांच्या खात्यात मजुरी जमा केली जाते. या वर्षी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून विशेष स्वरुपात नरेगा योजनेतून कामांना सुरुवात करण्यात आली. ३१ मार्च २0१६ पर्यंत जिल्ह्यात ८१0 कामांना सुरुवात करण्यात आली असून, यात जवळपास ३६ हजार २४६ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. नरेगातून ग्रामपंचायत स्तरावर ४३९ कामं केली जात आहेत. यात जवळपास २२ हजार २७0 मजूर काम करीत आहेत. इतर विविध विभागांकडून ३७१ कामे सुरू असून, यात १३ हजार ९७६ मजुरांना काम मिळाली आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेकडो मजुरांसाठी काम उपलब्ध नव्हते. परिणामी बर्‍याच ठिकाणी मजूरवर्गाचे इतर जिल्ह्यात व राज्यात पलायन सुरु होते. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी प्रशासनाकडून कामांची संख्या वाढविण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील मजुरांना मोठय़ा प्रमाणात कामे उपलब्ध झाली आहेत.