शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

३५० शेतकऱ्यांच्याच तुरीचे मोजमाप!

By admin | Updated: May 30, 2017 01:05 IST

मोजमाप त्वरित करण्याबाबत माजी आ.सानंदा यांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शासनाच्या हमीदर योजने अंतर्गत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये राज्य शासन बाजार हस्तक्षेप योजना अंतर्गत तूर खरेदी करण्यात येत आहे. यासाठी सुमारे १८०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना अद्यापपर्यंत केवळ ३५० शेतकऱ्यांच्याच तुरीचे मोजमाप करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे व पेरणीचे दिवस पाहता तुरीचे मोजमापाला गती द्यावी, अन्यथा भाराकाँच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी दिला. यावर्षी तुरीचे भाव बाजारात पडल्याने उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना केवळ शासनाच्या हमीदर केंद्राचा आधार आहे; मात्र शेतकऱ्यांच्या घरात अजूनही तूर पडलेली असताना या केंद्रावर तुरीच्या विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या तुरीची नोंदणीसाठी ३१ मे ही अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे; मात्र याआधीचा अनुभव पाहता व तूर मोजणीला होणारा विलंब व परिणामी शेतकऱ्यांना बसणारा भुर्दंड पाहता शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी नोंदणीची पद्धत सुरु करण्यात आली आहे; मात्र हवामान खात्याने मान्सून येण्याची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप तातडीने होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तूर खरेदी केंद्राला भेट देत जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे तसेच उपजिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याशी याबाबत भ्रमणध्वनीव्दारे चर्चा करीत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी होण्याबाबत मागणी रेटली तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे यांना केंद्रावर बोलावून त्यांना नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याबाबत मागणी मांडत यासाठी वाढीव वजनकाटे, कर्मचारी वर्ग आदींसह इतर आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत आश्वस्त करीत कृउबासला तसे निर्देश दिले. एकूणच पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी व्हावी, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. तसेच आपली तूर खरेदी होईल की नाही, असा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या सर्वच शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी केली जावी, अन्यथा आंदोलनाचा इशारादेखील यावेळी माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी दिला. यावेळी कृउबास सभापती संतोष टाले, माजी जि.प.सदस्य गजानन वाकुडकर, येथील हमीदर केंद्रप्रमुख क्यावल आदींसह कृउबासचे इतर संचालक तसेच शेतकरी आदींची उपस्थिती होती.