शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

३५ हजार शेतक-यांपैकी १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:13 IST

मेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकºयांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसरकारची कर्जमाफीची योजना फसवी - शिवसेनेचे आरोपसरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकºयांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.मेहकर तालुक्यात अलीकडच्या काळात पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. दरवर्षी शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. विविध बँकांचा कर्जाचा बोजा शेतकºयांवर वाढतच आहे. सरकार कडूनही आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. भाजप सरकारने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. मात्र, सरकारने कर्जाचा अर्ज भरुन घेत असताना त्या अर्जामध्ये तब्बल ५६ अटी टाकल्या असून, बहुतांश अटी ह्या जाचक आहेत. कर्जमाफीचे अर्ज हे आॅनलाईन भरायचे आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मेहकर तालुक्यात १६१ ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रापैकी केवळ ७ केंद्र सुरु आहेत. तर या केंद्रावर थम्ब मशिन नाहीत, इंटरनेट सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे शेतकºयांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ आॅगस्ट रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर यांचे नेतृत्वात विभागप्रमुख राजु चव्हाण, प्रमोद काळे, अशोक बोरकर, गणेश  शेवाळे, संदीप गायकवाड, उत्तम परमाळे, रोहीदास जाधव, अशोक पसरटे, सुपाजी जाधव, तसेच प्रत्येक शाखा प्रमुखाने मेहकर तालुक्यातील प्रत्येक ई-सेवा केंद्रावर जाऊन किती शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले या संदर्भात माहिती घेतली असता जवळपास ३५ हजार शेतकºयांपैकी केवळ १६६ शेतकºयांनी कर्ज माफीचे अर्ज भरल्याचे आढळून आले. त्यामुळे सरकारच्या जाचक अटी, सुविधा नसणे, शेतकºयांमध्ये सरकार बद्दल रोष या सर्व गोष्टी पाहता सरकारची कर्जमाफीची घोषणा ही शेतकºयांची दिशाभुल करणारी व फसवी असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे.