शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

३५ हजार शेतक-यांपैकी १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:13 IST

मेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकºयांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसरकारची कर्जमाफीची योजना फसवी - शिवसेनेचे आरोपसरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकºयांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.मेहकर तालुक्यात अलीकडच्या काळात पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. दरवर्षी शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. विविध बँकांचा कर्जाचा बोजा शेतकºयांवर वाढतच आहे. सरकार कडूनही आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. भाजप सरकारने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. मात्र, सरकारने कर्जाचा अर्ज भरुन घेत असताना त्या अर्जामध्ये तब्बल ५६ अटी टाकल्या असून, बहुतांश अटी ह्या जाचक आहेत. कर्जमाफीचे अर्ज हे आॅनलाईन भरायचे आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मेहकर तालुक्यात १६१ ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रापैकी केवळ ७ केंद्र सुरु आहेत. तर या केंद्रावर थम्ब मशिन नाहीत, इंटरनेट सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे शेतकºयांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ आॅगस्ट रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर यांचे नेतृत्वात विभागप्रमुख राजु चव्हाण, प्रमोद काळे, अशोक बोरकर, गणेश  शेवाळे, संदीप गायकवाड, उत्तम परमाळे, रोहीदास जाधव, अशोक पसरटे, सुपाजी जाधव, तसेच प्रत्येक शाखा प्रमुखाने मेहकर तालुक्यातील प्रत्येक ई-सेवा केंद्रावर जाऊन किती शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले या संदर्भात माहिती घेतली असता जवळपास ३५ हजार शेतकºयांपैकी केवळ १६६ शेतकºयांनी कर्ज माफीचे अर्ज भरल्याचे आढळून आले. त्यामुळे सरकारच्या जाचक अटी, सुविधा नसणे, शेतकºयांमध्ये सरकार बद्दल रोष या सर्व गोष्टी पाहता सरकारची कर्जमाफीची घोषणा ही शेतकºयांची दिशाभुल करणारी व फसवी असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे.