शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

३५ हजार शेतक-यांपैकी १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:13 IST

मेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकºयांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसरकारची कर्जमाफीची योजना फसवी - शिवसेनेचे आरोपसरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकºयांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.मेहकर तालुक्यात अलीकडच्या काळात पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. दरवर्षी शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. विविध बँकांचा कर्जाचा बोजा शेतकºयांवर वाढतच आहे. सरकार कडूनही आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. भाजप सरकारने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. मात्र, सरकारने कर्जाचा अर्ज भरुन घेत असताना त्या अर्जामध्ये तब्बल ५६ अटी टाकल्या असून, बहुतांश अटी ह्या जाचक आहेत. कर्जमाफीचे अर्ज हे आॅनलाईन भरायचे आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मेहकर तालुक्यात १६१ ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रापैकी केवळ ७ केंद्र सुरु आहेत. तर या केंद्रावर थम्ब मशिन नाहीत, इंटरनेट सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे शेतकºयांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ आॅगस्ट रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर यांचे नेतृत्वात विभागप्रमुख राजु चव्हाण, प्रमोद काळे, अशोक बोरकर, गणेश  शेवाळे, संदीप गायकवाड, उत्तम परमाळे, रोहीदास जाधव, अशोक पसरटे, सुपाजी जाधव, तसेच प्रत्येक शाखा प्रमुखाने मेहकर तालुक्यातील प्रत्येक ई-सेवा केंद्रावर जाऊन किती शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले या संदर्भात माहिती घेतली असता जवळपास ३५ हजार शेतकºयांपैकी केवळ १६६ शेतकºयांनी कर्ज माफीचे अर्ज भरल्याचे आढळून आले. त्यामुळे सरकारच्या जाचक अटी, सुविधा नसणे, शेतकºयांमध्ये सरकार बद्दल रोष या सर्व गोष्टी पाहता सरकारची कर्जमाफीची घोषणा ही शेतकºयांची दिशाभुल करणारी व फसवी असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे.