शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

येनगाव येथे ३५ घरांना भीषण आग

By admin | Updated: April 12, 2017 00:41 IST

जळगाव जामोद : तालुक्यात ग्राम येनगाव येथे ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग भीषण स्वरूपाची होती.

जीवितहानी टळली; घरगुती लाखोंचे साहित्य जळून खाक

जळगाव जामोद : तालुक्यात ग्राम येनगाव येथे ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग भीषण स्वरूपाची होती. भरदुपारी उन्हाच्यावेळी लागलेल्या या आगीत तब्बल ३५ घरे जळाली असून, ही सर्व कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आगीत घरगुती सामान जळाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.येनगाव हे वडशिंगीपासून २ कि.मी. दक्षिणेस खेडेगाव असून, गावात झोपड्यांच्या घरात राहणारी कुटुंबे आहेत. अशा वेळी स्वयंपाक झाल्यानंतर कुणाच्या तरी चुलीमध्ये विस्तव राहिला व हवेने आग लागल्याचे बोलल्या जात आहे. ही आग दुपारी १२ वाजताच्या सुमारास लागली. यावेळी गावकरी तथा मडाखेड खुर्दवासी धावून आले. मडाखेड येथे आग विजविण्यासाठी टँकर बोलावण्यात आले; परंतु आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच जळगाव नगर परिषदेची अग्निशमन गाडी बोलावण्यात आली. तसेच प्रसेनजित पाटील हे तत्काळ हजर होऊन त्यांनीही यंत्रणांना फोन करून बोलावले. जळगावचे ठाणेदार साळुंके, पोकाँ विश्वनाथ जाधवसह पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी घटनास्थळी येऊन आग विजविण्यास मदत केली. दुपारी २ वा. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.आगीची माहिती मिळताच जळगाव जामोद तहसीलकडून मंडळ अधिकारी एच.उकर्डे, तलाठी एस.पी. श्रीनाथ यांनी घटनास्थळी जावून प्राथमिक पाहणी केली, तर या कुटुंबियांच्या जळालेल्या घरांचा पंचनामा १२ एप्रिल रोजी करणार असल्याचे सांगितले. उघड्यावर आलेल्या कुटुंबियांची जेवणाची व्यवस्था गावकऱ्यांनी केली, तर त्यांना अन्नधान्य व चहाची व्यवस्था तहसीलकडून देण्याची माहिती दिली. आग लागली त्या दरम्यान येनगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, जि.प.चे बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे यांनीही भेट देऊन पाहणी केली. या कुटुंबांना पोचली आगीची झळया आगीमध्ये ३५ घरांचे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यामध्ये रामहरी भारसाकळे, प्रदीप वाघ, एकनाथ वानखडे, आनंद वानखडे, संतोष दामोधर, बाबूराव सिरसाट, भगवान जवंजाळ, रवींद्र सिरसाट, राजेश जवंजाळ, ज्ञानशिल दाभाडे, श्रावण जवंजाळ, अरूण दाभाडे, मरी दाभाडे, मंगेश दाभाडे, विनायक जवंजाळ, दादाराव भारसाकळे, नीलेश दाभाडे, पांडुरंग भारसाकळे, विनोद भारसाकळे, शिवहरी भारसाकळे, शेषराव सिरसाट, प्रमोद सिरसाट, भरत इंगळे, समाधान इंगळे, नागोराव दाभाडे, जितेंद्र सिरसाट, अशोक दाभाडे, सुगदेव वानखडे, वासुदेव दाभाडे, धर्मकुमार सुरळकार, गंगाराम सिरसाट, सुनंदा दाभाडे, देवमन दाभाडे, रवींद्र दाभाडे, सोनाबाई दाभाडे यांचा समावेश आहे.लाखोंचे घरगुती साहित्य, अन्नधान्य जळालेया आगीमुळे घरांसह आजूबाजूच्या परिसरातील पराट्या, कुटार, गोठ्यांनीही पेट घेतला. त्यात ३५ घरांना चांगलीच झळ पोचली. या ३५ घरातील अन्नधान्य, कपडेलत्ते, गृहपयोगी भांडी, अंथरूण, पांघरूण यासह सर्व साहित्य जळून बेचिराख झाले. त्यामुळे हे सर्व ३५ कुटुंब उघड्यावर आली आहेत.