शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यात ७१ अपघात महामार्गावर ३५ व्यक्तींचा मृत्यू

By admin | Updated: June 16, 2014 00:52 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मागील पाच महिन्यात ७१ अपघात झाले आहेत. यामध्ये ३५ जणांचा मृत्यू तर ७४ जण गंभीररीत्या जखमी झाले.

खामगाव : शहराजवळून जाणार्‍या मुंबई-कोलकता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मागील पाच महिन्यात ७१ अपघात झाले आहेत. यामध्ये ३५ जणांचा मृत्यू तर ७४ जण गंभीररीत्या जखमी झाले. २८ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.खामगाव उपविभागामध्ये असलेल्या महामार्गात खामगाव ते अकोला रस्ता असून, खामगाव ते शेगाव हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरती अपघाताची मालिकाच सुरु आहे. प्रत्येक दिवशी अपघात झाल्याची माहिती मिळते. यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या रस्त्यावरील अपघातासाठी वाहनचालकांच्या चुका, वाहनांची दुरवस्था, रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे, महामार्गावर बिनदिक्कतपणे धावणारे ट्रॅक्टर, ऑटोरिक्षा व इतर तत्सम वाहने, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभी केलेली वाहने, सहज उपलब्ध होणारे वाहन चालक परवाने, रस्त्यांवर आवश्यक त्या चिन्हांचा अभाव, रस्ता सुरक्षिततेचा अभाव महामार्गावर असलेले अपघाती वळणे, रस्त्यावरील खड्डे, अनेक ठिकाणी गतिरोधक टाकलेले आहेत; मात्र त्या ठिकाणी पांढरे पट्टे किंवा सूचना फलक लावलेले नाहीत, यामुळेही अपघात वाढत आहेत. शासनाने विविध कायदे करुन अपघात रोखण्याचे प्रयत्न केले आहेत; मात्र तरीदेखील हे अपघात कमी होण्याऐवजी वाढत आहेत. दररोज वाढणारी वाहनांची संख्या चिंतेचा विषय बनत आहे. महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच यंत्रणा आपल्याकडे नाही. प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिस नियुक्त करणे शक्य नाही. स्वत: वाहनचालकानेच काळजी घेण्याची गरज आहे. भरघाव वेगाने जाणार्‍या वाहनांवर वेळोवेळी दंडही केला जातो. अनेक व्यक्ती कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात. अपघात कितीही मोठा असला तरी त्यामध्ये लगेच जामीन मिळत असल्यामुळे त्याकडे गंभीरपणे पाहायला कोणीच तयार नाही. ** भरधाव वेगाने वाहन चालवणे, या कारणामुळे अनेक अपघात होऊन काही जण आपला जीव गमवतात तर काही जण कायमचे जायबंदी होत आहेत.** शासनाने विविध कायदे करुन अपघात रोखण्याचे प्रयत्न केले आहेत; मात्र तरीदेखील हे अपघात कमी होण्याऐवजी वाढत आहेत.** रस्त्यांवर आवश्यक त्या चिन्हांचा अभाव, रस्ता सुरक्षिततेचा अभाव महामार्गावर असलेले अपघाती वळणे, रस्त्यावरील खड्डे, अनेक ठिकाणी गतिरोधक टाकलेले आहेत; मात्र त्या ठिकाणी पांढरे पट्टे, वा सूचना फलक लावलेले नाहीत, यामुळेही अपघात वाढत आहेत.