शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पाच महिन्यात ७१ अपघात महामार्गावर ३५ व्यक्तींचा मृत्यू

By admin | Updated: June 16, 2014 00:52 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मागील पाच महिन्यात ७१ अपघात झाले आहेत. यामध्ये ३५ जणांचा मृत्यू तर ७४ जण गंभीररीत्या जखमी झाले.

खामगाव : शहराजवळून जाणार्‍या मुंबई-कोलकता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मागील पाच महिन्यात ७१ अपघात झाले आहेत. यामध्ये ३५ जणांचा मृत्यू तर ७४ जण गंभीररीत्या जखमी झाले. २८ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.खामगाव उपविभागामध्ये असलेल्या महामार्गात खामगाव ते अकोला रस्ता असून, खामगाव ते शेगाव हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरती अपघाताची मालिकाच सुरु आहे. प्रत्येक दिवशी अपघात झाल्याची माहिती मिळते. यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या रस्त्यावरील अपघातासाठी वाहनचालकांच्या चुका, वाहनांची दुरवस्था, रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे, महामार्गावर बिनदिक्कतपणे धावणारे ट्रॅक्टर, ऑटोरिक्षा व इतर तत्सम वाहने, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभी केलेली वाहने, सहज उपलब्ध होणारे वाहन चालक परवाने, रस्त्यांवर आवश्यक त्या चिन्हांचा अभाव, रस्ता सुरक्षिततेचा अभाव महामार्गावर असलेले अपघाती वळणे, रस्त्यावरील खड्डे, अनेक ठिकाणी गतिरोधक टाकलेले आहेत; मात्र त्या ठिकाणी पांढरे पट्टे किंवा सूचना फलक लावलेले नाहीत, यामुळेही अपघात वाढत आहेत. शासनाने विविध कायदे करुन अपघात रोखण्याचे प्रयत्न केले आहेत; मात्र तरीदेखील हे अपघात कमी होण्याऐवजी वाढत आहेत. दररोज वाढणारी वाहनांची संख्या चिंतेचा विषय बनत आहे. महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच यंत्रणा आपल्याकडे नाही. प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिस नियुक्त करणे शक्य नाही. स्वत: वाहनचालकानेच काळजी घेण्याची गरज आहे. भरघाव वेगाने जाणार्‍या वाहनांवर वेळोवेळी दंडही केला जातो. अनेक व्यक्ती कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात. अपघात कितीही मोठा असला तरी त्यामध्ये लगेच जामीन मिळत असल्यामुळे त्याकडे गंभीरपणे पाहायला कोणीच तयार नाही. ** भरधाव वेगाने वाहन चालवणे, या कारणामुळे अनेक अपघात होऊन काही जण आपला जीव गमवतात तर काही जण कायमचे जायबंदी होत आहेत.** शासनाने विविध कायदे करुन अपघात रोखण्याचे प्रयत्न केले आहेत; मात्र तरीदेखील हे अपघात कमी होण्याऐवजी वाढत आहेत.** रस्त्यांवर आवश्यक त्या चिन्हांचा अभाव, रस्ता सुरक्षिततेचा अभाव महामार्गावर असलेले अपघाती वळणे, रस्त्यावरील खड्डे, अनेक ठिकाणी गतिरोधक टाकलेले आहेत; मात्र त्या ठिकाणी पांढरे पट्टे, वा सूचना फलक लावलेले नाहीत, यामुळेही अपघात वाढत आहेत.