शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

आरटीईच्या २१४२ जागांसाठी ३४३६ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशाची लॉटरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यासाठीचे नियोजन शालेय ...

आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशाची लॉटरी एप्रिलच्या पहिल्या

आठवड्यात प्रसिद्ध करण्यासाठीचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत ३० मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण २ हजार १४२ जागांसाठी ३ हजार ४३६ ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहेत.

विविध माध्यमांच्या, विविध शाळांमधील प्रवेशांसाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता ३ मार्च ते ३० मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. जिल्ह्यात आरटीई प्रवेशप्रक्रियेत यंदा २३१ शाळांनी नोंदणी केली असून, प्रवेशासाठी एकूण २,१४२ जागा उपलब्ध आहेत. त्या नोंदणीची मुदत संपल्यावर आता प्रवेशाची लॉटरी काढण्याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत 'डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह' करण्याचे काम पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. ३ एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाहीत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लॉटरी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, आरटीई २५ टक्के या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत देण्यात येणारी शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारने तीन वर्षांपासून दिलेली

नाही. परिणामी, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले जाणार नसल्याची भूमिका काही खासगी

शाळाचालकांनी घेतली आहे. काही खासगी शाळांनी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे सरकार शुल्क प्रतिपूर्ती देत नाही आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा म्हणून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे या शाळांनी या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

आरटईअंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंदणी - २३१

जागा किती - २१४२

अर्ज किती - ३४३६

आता लक्ष लॉटरीकडे

आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता पालकांचे लक्ष निवड प्रक्रियेसाठी काढण्यात येणाऱ्या आरटीईच्या ऑनलाईन लॉटरीकडे लागले आहे. परंतु काही शाळांचा या प्रवेश प्रक्रियेवर असलेला बहिष्कार पाहता, आता लॉटरी घोषित झाल्यावर या शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास शासन काय पावले उचलणार, हा प्रश्नसुद्धा पालकांमधून उपस्थित होत आहे.