शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या २१४२ जागांसाठी ३४३६ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशाची लॉटरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यासाठीचे नियोजन शालेय ...

आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशाची लॉटरी एप्रिलच्या पहिल्या

आठवड्यात प्रसिद्ध करण्यासाठीचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत ३० मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण २ हजार १४२ जागांसाठी ३ हजार ४३६ ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहेत.

विविध माध्यमांच्या, विविध शाळांमधील प्रवेशांसाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता ३ मार्च ते ३० मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. जिल्ह्यात आरटीई प्रवेशप्रक्रियेत यंदा २३१ शाळांनी नोंदणी केली असून, प्रवेशासाठी एकूण २,१४२ जागा उपलब्ध आहेत. त्या नोंदणीची मुदत संपल्यावर आता प्रवेशाची लॉटरी काढण्याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत 'डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह' करण्याचे काम पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. ३ एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाहीत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लॉटरी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, आरटीई २५ टक्के या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत देण्यात येणारी शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारने तीन वर्षांपासून दिलेली

नाही. परिणामी, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले जाणार नसल्याची भूमिका काही खासगी

शाळाचालकांनी घेतली आहे. काही खासगी शाळांनी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे सरकार शुल्क प्रतिपूर्ती देत नाही आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा म्हणून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे या शाळांनी या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

आरटईअंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंदणी - २३१

जागा किती - २१४२

अर्ज किती - ३४३६

आता लक्ष लॉटरीकडे

आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता पालकांचे लक्ष निवड प्रक्रियेसाठी काढण्यात येणाऱ्या आरटीईच्या ऑनलाईन लॉटरीकडे लागले आहे. परंतु काही शाळांचा या प्रवेश प्रक्रियेवर असलेला बहिष्कार पाहता, आता लॉटरी घोषित झाल्यावर या शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास शासन काय पावले उचलणार, हा प्रश्नसुद्धा पालकांमधून उपस्थित होत आहे.