शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

२९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST

संदीप वानखडे बुलडाणा : खरीप पीक कर्ज वाटपाची मुदत अवघी दहा दिवस राहिली असतानाच जिल्ह्यातील २९ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही ...

संदीप वानखडे

बुलडाणा : खरीप पीक कर्ज वाटपाची मुदत अवघी दहा दिवस राहिली असतानाच जिल्ह्यातील २९ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे़ खरीप हंगाम संपत आला असला तरी ४१ हजार ३९९ शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही़ यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचे रिन्यूव्हल केले नसल्याने नवीन पीक कर्ज मिळालेले नाही.

निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे़ गेल्या वर्षी शासनाने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले हाेते़ त्यानंतर कर्जाचे पुनर्गठण व नूतनीकरण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटींचे पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले हाेते़ त्यापैकी आतापर्यंत ९८ हजार ६०१ शेतकऱ्यांना ९२३ काेटी ३१ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे़ अजूनही २९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही़ ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्ज घेण्याची मुदत आहे़ त्यानंतर रब्बी पीक कर्ज वितरण सुरू हाेणार आहे़

कर्जमाफीचा घाेळ सुरूच

अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज माफीचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे़ काही शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत नसल्याने अडचणी येत आहेत़ अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठणही झाले नाही़ तसेच पीक कर्जापासून बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचे रिन्यूव्हल केले नाही़ त्यामुळे, त्यांना पीक कर्जाचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे़

बँक ऑफ इंडिया आघाडीवर

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात बँक ऑफ इंडिया आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या बँकेने २५०० शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केले. तसेच युनियन बँकेने ९२ टक्के, सेंटल बँक ऑफ इंडियाने ८२ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाने ८१ टक्के पीक कर्ज वाटप केले हाेते.

गेल्या वर्षी १२५५ काेटींचे कर्ज वाटप

गेल्या वर्षी १ लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १२५५ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले हाेते. यावर्षी १३ सप्टेंबरपर्यंत ९२३ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

अनेक बँकांनी पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढले आहेत. काही शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे रिन्यूव्हल केले नसल्याने त्यांना नवीन कर्ज मिळालेले नाहीत़ ३० सप्टेंबर राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहेत़

नरेश हेडाऊ, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅक, बुलडाणा

बँक ऑफ इंडिया आघाडीवर

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात बँक ऑफ इंडिया आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या बँकेने २५०० शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केले. तसेच युनियन बँकेने ९२ टक्के, सेंटल बँक ऑफ इंडियाने ८२ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाने ८१ टक्के पीक कर्ज वाटप केले हाेते.

गेल्या वर्षी १२५५ काेटींचे कर्ज वाटप

गेल्या वर्षी १ लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १२५५ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले हाेते. यावर्षी १३ सप्टेंबरपर्यंत ९२३ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

१४००००

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य

१३००००

लाखांचे हाेणार आहे वितरण

९८६०१

शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज

९२३३१

रुपयांचे कर्ज झाले वितरीत