शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

२९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST

संदीप वानखडे बुलडाणा : खरीप पीक कर्ज वाटपाची मुदत अवघी दहा दिवस राहिली असतानाच जिल्ह्यातील २९ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही ...

संदीप वानखडे

बुलडाणा : खरीप पीक कर्ज वाटपाची मुदत अवघी दहा दिवस राहिली असतानाच जिल्ह्यातील २९ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे़ खरीप हंगाम संपत आला असला तरी ४१ हजार ३९९ शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही़ यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचे रिन्यूव्हल केले नसल्याने नवीन पीक कर्ज मिळालेले नाही.

निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे़ गेल्या वर्षी शासनाने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले हाेते़ त्यानंतर कर्जाचे पुनर्गठण व नूतनीकरण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटींचे पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले हाेते़ त्यापैकी आतापर्यंत ९८ हजार ६०१ शेतकऱ्यांना ९२३ काेटी ३१ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे़ अजूनही २९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही़ ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्ज घेण्याची मुदत आहे़ त्यानंतर रब्बी पीक कर्ज वितरण सुरू हाेणार आहे़

कर्जमाफीचा घाेळ सुरूच

अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज माफीचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे़ काही शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत नसल्याने अडचणी येत आहेत़ अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठणही झाले नाही़ तसेच पीक कर्जापासून बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचे रिन्यूव्हल केले नाही़ त्यामुळे, त्यांना पीक कर्जाचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे़

बँक ऑफ इंडिया आघाडीवर

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात बँक ऑफ इंडिया आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या बँकेने २५०० शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केले. तसेच युनियन बँकेने ९२ टक्के, सेंटल बँक ऑफ इंडियाने ८२ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाने ८१ टक्के पीक कर्ज वाटप केले हाेते.

गेल्या वर्षी १२५५ काेटींचे कर्ज वाटप

गेल्या वर्षी १ लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १२५५ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले हाेते. यावर्षी १३ सप्टेंबरपर्यंत ९२३ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

अनेक बँकांनी पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढले आहेत. काही शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे रिन्यूव्हल केले नसल्याने त्यांना नवीन कर्ज मिळालेले नाहीत़ ३० सप्टेंबर राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहेत़

नरेश हेडाऊ, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅक, बुलडाणा

बँक ऑफ इंडिया आघाडीवर

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात बँक ऑफ इंडिया आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या बँकेने २५०० शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केले. तसेच युनियन बँकेने ९२ टक्के, सेंटल बँक ऑफ इंडियाने ८२ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाने ८१ टक्के पीक कर्ज वाटप केले हाेते.

गेल्या वर्षी १२५५ काेटींचे कर्ज वाटप

गेल्या वर्षी १ लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १२५५ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले हाेते. यावर्षी १३ सप्टेंबरपर्यंत ९२३ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

१४००००

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य

१३००००

लाखांचे हाेणार आहे वितरण

९८६०१

शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज

९२३३१

रुपयांचे कर्ज झाले वितरीत