शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

२८ ग्रामपंचायती कागदोपत्रीच हगणदरीमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:35 IST

संग्रामपूर: तालुक्यातील २८ ग्रामपंचायती  हगणदरीमुक्त घोषित झाल्या आहेत; मात्र यातील बहुतांश गावांमध्ये शौचालयांचा वापर होत नसून, नागरिक अद्यापही उघड्यावरच शौचास बसत आहेत. अशा वेळी गुडमॉर्निंग पथकाची गरज असताना पंचायत समितीने मात्र असे पथकच स्थापन केलेले नाही. त्यामुळे तालुक्यात स्वच्छ भारत मिशन फक्त कागदोपत्रीच सुरू असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देअनेक गावात शौचालयांचा वापर नाही गुडमॉर्निंग पथकाच्या स्थापनेकडे पं.स.चे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील २८ ग्रामपंचायती  हगणदरीमुक्त घोषित झाल्या आहेत; मात्र यातील बहुतांश गावांमध्ये शौचालयांचा वापर होत नसून, नागरिक अद्यापही उघड्यावरच शौचास बसत आहेत. अशा वेळी गुडमॉर्निंग पथकाची गरज असताना पंचायत समितीने मात्र असे पथकच स्थापन केलेले नाही. त्यामुळे तालुक्यात स्वच्छ भारत मिशन फक्त कागदोपत्रीच सुरू असल्याचे दिसून येते.संग्रामपूर तालुका हा संपूर्ण हगणदरीमुक्त करण्यासाठी १५ सप्टेंबर २0१७ ही डेडलाइन आहे. तालुक्यात एकूण ५0 ग्रामपंचायती असून, त्यापैकी २८ ग्रामपंचायती या हगणदरीमुक्त झाल्याचा आकडा हा फक्त कागदोपत्री दाखविण्यात येत आहे; मात्र प्रत्यक्षात करमोडा गाव वगळता इतर हगणदरीमुक्त घोषित झालेल्या बहुतांश गावामध्ये नागरिक हे उघड्यावरच शौचास बसताना दिसत आहेत. सद्यस्थितीत २२ ग्रामपंचायती या अद्यापही हगणदरीमुक्त झालेल्या नाहीत. तसेच या ग्रामपंचायती हगणदरीमुक्त व्हाव्या याकरिता पंचायत समितीने साधी गुडमॉर्निंग पथकाचीही स्थापना केलेली नसल्याची बाब उघड झाली आहे. पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी हे उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर कुठल्याही कारवाया करताना दिसून येत नसल्यामुळे व उघड्यावर शौचास बसणार्‍यांना गुडमॉर्निंग पथकाच्यावतीने कुठलीही समज दिली जात नसल्यामुळे कागदोपत्री हगणदरीमुक्त झालेल्या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरिक हे उघड्यावरच शौचास बसत आहेत. त्यामुळे ही गावे हगणदरीमुक्त कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.सन २0१२ च्या बेसलाइन सर्व्हेनुसार तालुक्यात एकूण २२ हजार ७0 एवढी कुटुंब संख्या होती. त्यापैकी ९ हजार ९७९ कुटुंबांकडे त्यावेळी बेसलाइन सर्व्हेनुसार शौचालये होती. तर शौचालय नसलेल्या कुटुंबाची संख्या १२ हजार ९१ एवढी होती. सन २0१३-१४ मध्ये १ हजार ६२, सन २0१४-१५ मध्ये १ हजार १९0, सन २0१५-१६ मध्ये १ हजार ५२४, सन २0१६-१७ मध्ये ३ हजार १६ तर २0१७ ते ऑगस्ट २0१७ पर्यंत १ हजार १४९ शौचालयाचे असे एकूण चार वर्षांमध्ये ७ हजार ९४१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण होऊन या शौचालयाचा वापर नागरिक करीत असल्याचा आकडा दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात काही कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम तर केले; मात्र या शौचालयाचा वापर हे कुटुंब करीत नसल्यामुळे स्वच्छ भारत मिशनचा उद्देश सफल झालेला नाही. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे या कुटुंबातील नागरिक आजही उघड्यावरच शौचास बसत आहेत. त्यामुळे गाव परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.                        

पंचायत समिती स्तरावर गुडमॉर्निंग पथकाची स्थापना झालेली नाही; मात्र ग्रामपंचायत स्तरावर पथक स्थापन झाल्यास त्यामध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता हे सहभागी होत असतात.- डी.आर. हिरोळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, संग्रामपूर