शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सरपंचांच्या सात जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात

By संदीप वानखेडे | Updated: September 6, 2022 18:43 IST

सदस्यपदांच्या ६६ जागांसाठी १०९ उमेदवारांमध्ये हाेणार लढत

बुलढाणा : जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ६ सप्टेंबरपर्यंत मुदत हाेती़ सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी ४६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यापैकी १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता २८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. थेट जनतेतून सरपंचाची निवड हाेणार असल्याने चुरस वाढली आहे. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ३४ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले आहेत. त्यामुळे, आता १०९ उमेदवार रिंगणात आहेत. जळगाव जामाेद तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने ते पद रिक्त राहणार आहे़

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे़ सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे़ त्यामुळे, उमेदवारांची संख्या वाढली हाेती़ उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे काेण घेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. संग्रामपूर तालुक्यातील सायखेड येथे सरपंचपदासाठी आठ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले हाेते़ त्यापैकी दाेन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सहा उमेदवारांमध्ये लढत हाेणार आहे. नांदुरा तालुक्यातील हिंगणा भाेटा येथे सरपंचपदासाठी १० उमेदवार रिंगणात हाेते, त्यापैकी ५ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने पाच जणांमध्ये लढत हाेणार आहे. 

लाेणार तालुक्यातील दाेन ग्रामपंचातींच्या सरपंचपदासाठी १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले हाेते. त्यापैकी १० जणांनी माघार घेतल्याने ७ जणांमध्ये लढत हाेणार आहे. तसेच चिखली तालुक्यातील तीन जागांसाठी ११ अर्ज वैध ठरले हाेते. त्यापैकी एकाने मागे घेतल्याने १० उमेदवारांमध्ये लढत हाेणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकbuldhanaबुलडाणा