शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

२७७ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडणार!

By admin | Updated: January 15, 2016 02:13 IST

ई-पंचायत अंमलबजावणीस येणार गती; मार्चअखेर २१0 ग्रामपंचायतींचे काम होणार पूर्ण.

बुलडाणा: ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला असून, बुलडाणा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात २७७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यंंत २१0 ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात येणार असल्याने ह्या ग्रामपंचायती ऑनलाइन होणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायत स्तरापर्यंत उच्चक्षमता व उच्च दर्जाची ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देऊन ई-पंचायत अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन व बीएसएनएल या तिघांमध्ये १२ एप्रिल २0१३ मध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम केला आहे. या योजनेमुळे राज्यातील ग्रामपंचायत स्तरापर्यंंत ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे इंटरनेट ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे ई-गव्हर्नन्स, ई-पंचायत (संग्राम) प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे. तसेच ग्रामीण नागरिकांनाही विविध सेवा सुविधा कमी श्रमात व कमी वेळात त्यांचे रहिवासी क्षेत्रात उपलब्ध करून देता येणे शक्य होणार आहे. राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर आणि नांदुरा या चार तालुक्यातील २७७ ग्रामपंचा समावेश करण्यात आला आहे. सध्या या चारही तालुक्यात खोदकाम करून ऑप्टिकल फायबरचे केबल टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. आतापर्यंंत १७0 ग्रामपंचायतींचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. तर मार्च अखेरपर्यंंत २१0 ग्रामपंचायतींचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंंत बुलडाणा तालुक्यातील ६६, चिखली ९८, मलकापूर ४८ आणि नांदुरा तालुक्यातील ६५ अशा २७७ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू झाली आहेत.