शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

२७७ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडणार!

By admin | Updated: January 15, 2016 02:13 IST

ई-पंचायत अंमलबजावणीस येणार गती; मार्चअखेर २१0 ग्रामपंचायतींचे काम होणार पूर्ण.

बुलडाणा: ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला असून, बुलडाणा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात २७७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यंंत २१0 ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात येणार असल्याने ह्या ग्रामपंचायती ऑनलाइन होणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायत स्तरापर्यंत उच्चक्षमता व उच्च दर्जाची ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देऊन ई-पंचायत अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन व बीएसएनएल या तिघांमध्ये १२ एप्रिल २0१३ मध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम केला आहे. या योजनेमुळे राज्यातील ग्रामपंचायत स्तरापर्यंंत ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे इंटरनेट ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे ई-गव्हर्नन्स, ई-पंचायत (संग्राम) प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे. तसेच ग्रामीण नागरिकांनाही विविध सेवा सुविधा कमी श्रमात व कमी वेळात त्यांचे रहिवासी क्षेत्रात उपलब्ध करून देता येणे शक्य होणार आहे. राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर आणि नांदुरा या चार तालुक्यातील २७७ ग्रामपंचा समावेश करण्यात आला आहे. सध्या या चारही तालुक्यात खोदकाम करून ऑप्टिकल फायबरचे केबल टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. आतापर्यंंत १७0 ग्रामपंचायतींचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. तर मार्च अखेरपर्यंंत २१0 ग्रामपंचायतींचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंंत बुलडाणा तालुक्यातील ६६, चिखली ९८, मलकापूर ४८ आणि नांदुरा तालुक्यातील ६५ अशा २७७ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू झाली आहेत.