शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात २.६२ लाख शेतक-यांना कर्जमाफी

By admin | Updated: June 25, 2017 09:26 IST

कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकºयांना दिलासा.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: शब्द मागे घेत केली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपये कर्जमाफी मिळणार असून, यामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा होणार आहे. नाबार्डकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीचा फायदा २ लाख ६२ हजार ४७१ शेतकऱ्यांना होणार असून, ही रक्कम १७०७ कोटी एवढी येते. याबाबत अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडले होते. गेल्या चार वर्षांपासून शेतमालाचे पडते भाव पाहता शेतकरी कर्जाच्या खाईत जात होता. यावर्षी तर शेतमालाच्या भावांनी कधी नव्हे असा नीचांक गाठला. तूर, सोयाबीनच्या भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. भरमसाट तूर, सोयाबीन उत्पादन होऊनही शेतकऱ्यांच्या हाती फार काही पडले नव्हते. सर्वच शेतमालाची हीच अवस्था असल्याने शेतकरी कर्ज भरण्यासाठी सक्षम नव्हता त्यामुळे शेतकरी कर्जमाफी द्यावी, अशी मागणी होत होती. सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा कर्जमाफीचा मुद्दा घेतला होता. त्याआधारे विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडले. शेतकरी वर्गही कर्जमाफीची मागणी करत होता. शासनाचे मात्र चालढकल धोरण पुढे येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना पसरली होती. त्याचा उद्रेक पुणतांबा येथून झाला. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्याने राज्यातील सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांनी संप पुकारून शहरांना होणारा दूध व भाजीपाल्याचा पुरवठा रोखला. यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. आपसूकच याचा दबाव राज्य शासनावर वाढला होता. कोंडीत सापडलेल्या राज्य शासनाने ११ जून रोजी शेतकरी कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिल्याची घोषणा केली. नेमका यावेळी वरुणराजाही वेळेवर बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कर्जमाफीची घोषणा केल्याने आनंदाचे वातावरण होते; परंतु तत्त्वत: सारखे शब्दप्रयोग आल्याने कर्जमाफी होणार का? होणार तर कधी, कशी? असे प्रश्न शेतकऱ्यांपुढे होतेच. कर्जमाफी ३० जून १६ पर्यंत का ३१ मार्च १७ पर्यंत, ही उत्कंठासुद्धा लागून होती. याला २४ जून रोजी पूर्णविराम मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना ह्यकर्जमाफीह्णच्या माध्यमातून सरसकट दीड लाख रुपयापर्यंत राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. यापैकी तब्बल ४० लाख शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा होणार आहे. ही रक्कम ३४ हजार कोटींच्या आसपास आहे. जिल्ह्यात दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीने २ लाख ६२ हजार ४७१ शेतकऱ्यांना १७०७ कोटींची कर्जमाफी अपेक्षित आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश होतो. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला हा मोठाच दिलासा आहे. पीक कर्ज             एकूण शेतकरी          १,७७,५५८मुदती कर्ज            एकूण शेतकरी           ८४,९१३पीक कर्ज                       रक्कम             १०८६ कोटीमुदती शेती           कर्ज रक्कम                 ६२१ कोटीमुदती कर्ज व पीक कर्ज दोन्ही मिळून मिळणार दीड लाख रुपये कर्जमाफी, उर्वरित रक्कम भरावी लागणार