शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

बुलडाणा जिल्ह्यात २.६२ लाख शेतक-यांना कर्जमाफी

By admin | Updated: June 25, 2017 09:26 IST

कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकºयांना दिलासा.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: शब्द मागे घेत केली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपये कर्जमाफी मिळणार असून, यामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा होणार आहे. नाबार्डकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीचा फायदा २ लाख ६२ हजार ४७१ शेतकऱ्यांना होणार असून, ही रक्कम १७०७ कोटी एवढी येते. याबाबत अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडले होते. गेल्या चार वर्षांपासून शेतमालाचे पडते भाव पाहता शेतकरी कर्जाच्या खाईत जात होता. यावर्षी तर शेतमालाच्या भावांनी कधी नव्हे असा नीचांक गाठला. तूर, सोयाबीनच्या भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. भरमसाट तूर, सोयाबीन उत्पादन होऊनही शेतकऱ्यांच्या हाती फार काही पडले नव्हते. सर्वच शेतमालाची हीच अवस्था असल्याने शेतकरी कर्ज भरण्यासाठी सक्षम नव्हता त्यामुळे शेतकरी कर्जमाफी द्यावी, अशी मागणी होत होती. सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा कर्जमाफीचा मुद्दा घेतला होता. त्याआधारे विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडले. शेतकरी वर्गही कर्जमाफीची मागणी करत होता. शासनाचे मात्र चालढकल धोरण पुढे येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना पसरली होती. त्याचा उद्रेक पुणतांबा येथून झाला. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्याने राज्यातील सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांनी संप पुकारून शहरांना होणारा दूध व भाजीपाल्याचा पुरवठा रोखला. यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. आपसूकच याचा दबाव राज्य शासनावर वाढला होता. कोंडीत सापडलेल्या राज्य शासनाने ११ जून रोजी शेतकरी कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिल्याची घोषणा केली. नेमका यावेळी वरुणराजाही वेळेवर बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कर्जमाफीची घोषणा केल्याने आनंदाचे वातावरण होते; परंतु तत्त्वत: सारखे शब्दप्रयोग आल्याने कर्जमाफी होणार का? होणार तर कधी, कशी? असे प्रश्न शेतकऱ्यांपुढे होतेच. कर्जमाफी ३० जून १६ पर्यंत का ३१ मार्च १७ पर्यंत, ही उत्कंठासुद्धा लागून होती. याला २४ जून रोजी पूर्णविराम मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना ह्यकर्जमाफीह्णच्या माध्यमातून सरसकट दीड लाख रुपयापर्यंत राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. यापैकी तब्बल ४० लाख शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा होणार आहे. ही रक्कम ३४ हजार कोटींच्या आसपास आहे. जिल्ह्यात दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीने २ लाख ६२ हजार ४७१ शेतकऱ्यांना १७०७ कोटींची कर्जमाफी अपेक्षित आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश होतो. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला हा मोठाच दिलासा आहे. पीक कर्ज             एकूण शेतकरी          १,७७,५५८मुदती कर्ज            एकूण शेतकरी           ८४,९१३पीक कर्ज                       रक्कम             १०८६ कोटीमुदती शेती           कर्ज रक्कम                 ६२१ कोटीमुदती कर्ज व पीक कर्ज दोन्ही मिळून मिळणार दीड लाख रुपये कर्जमाफी, उर्वरित रक्कम भरावी लागणार