शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २६0 प्रकरणं दाखल

By admin | Updated: November 8, 2016 02:16 IST

वनक्षेत्रात वृक्षांची कत्तल सुरुच!

बुलडाणा, दि. ७- जिल्हा वन वैभवाने नटलेला असून ज्ञानगंगा, अंबाबरवासारखे अभयारण्य आणि लोणार येथील जागतिक ख्यातीचे लोणार सरोवर पर्यटकांना भुरळ घालतात. वन व वन्य प्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. मानवी अट्टाहासापायी वृक्षांची होणारी कत्तल आज मोठय़ा प्रमाणात सुरू असून, याप्रकरणी वर्षभरात २६0 गुन्हे दाखल झाले आहेत.वृक्षतोडीमुळे जिल्ह्यातील वनवैभव गुद्मरु लागले आहे. लाकूड तस्करांची कुर्‍हाड मोल्यवान वृक्ष संपदा नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. शेकडो वन औषध आणि विविध वन प्राण्यांसह पक्ष्यांच्या प्रजातींनी नटलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे वनवैभव टिकविण्याची मोठी जबाबदारी जिल्हावासीयांवर आली आहे. यात बुलडाणा वन परिक्षेत्रात गत एक वर्षात ३0७ वृक्षांची कत्तल करण्यात आल्याची माहिती पुढे आली. जिल्ह्याला ८४0 चौरस कि.मीचे वनक्षेत्र लाभले असून, यात ७५५ चौ.कि.मी. राखीव व ७७.६५ चौ.कि.मी संरक्षित क्षेत्र आहे, तरी या वनराईवर अवैध वृक्षतोड करणार्‍यांची वक्रदृष्टी आहे. याबाबत वन विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्याचे ६.१0 टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले असल्याचे सांगण्यात आले. वनक्षेत्रातील सागवन वृक्षाला लाकूड तस्करांनी प्रमुख लक्ष्य करून अनेक सागवृक्ष भुईसपाट केले.दहा महिन्यात ५९ प्रकरणंअवैध वृक्षतोड, प्राण्याची शिकार व अवैध वाहतूक तसेच वन जमिनीवर अतिक्रमण आदी घटना बुलडाणा वन क्षेत्रांमध्ये कमी झाल्याचे बोलले जात असताना, गत दहा महिन्यात या प्रकारातील ५९ प्रकरणं वन विभागाच्या दप्तरी नोंदविण्यात आले. यात आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ५0 हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. तर गत वर्षीचे ३४ प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत.