शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

२५ हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:33 IST

एकीकडे शेतकऱ्यांना गरजेनुरूप पीककर्ज वाटप करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, गतवर्षीच्या कर्जमाफी योजनेचा लाभच जिल्ह्यात ...

एकीकडे शेतकऱ्यांना गरजेनुरूप पीककर्ज वाटप करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, गतवर्षीच्या कर्जमाफी योजनेचा लाभच जिल्ह्यात २५ हजार शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे येत्या हंगामात ते प्रसंगी पीककर्जापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

--वार्षिक पतआराखड्याची प्रतीक्षा--

आगामी आर्थिक वर्षासाठीचा पतआराखडा अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामात पीककर्जासाठी किती पतपुरवठा केला जाणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वार्षिक पतआराखडा जाहीर होण्याची सध्या वाट पाहावी लागत आहे. दुसरीकडे नाबार्डचाही संभाव्य आराखडा हा प्रकाशित करण्यात आलेला नाही. त्याच्या आधारावरच जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा जाहीर होत असतो. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हे दोन्ही आराखडे प्रकाशित होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

--गेल्या वर्षी विक्रमी पीककर्ज वाटप--

गेल्यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात विक्रमी असे ५४ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप व रबी मिळून जिल्ह्यात २,७३३ कोटी ७२ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी १,४८४ कोटी १७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.