शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सोमवारी ठरणार २२८ ग्रामपंचायतचे कारभारी

By admin | Updated: August 31, 2015 01:28 IST

सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; सहलीवरून परतले सदस्य, ग्रामीण भागात उत्सुकता शिगेला.

बुलडाणा : मागील ४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुका ३१ ऑगस्ट व ९ सप्टेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. यामध्ये ३१ ऑगस्ट रोजी २२८, तर ९ सप्टेंबर रोजी उर्वरित २९३ ग्रामपंचायतींचे कारभारी ठरणार आहेत. ऑगस्ट महिन्यात मुदत संपलेल्या २२८, तर सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या २८८ आणि ऑक्टोबरमध्ये मुदत संपणार्‍या पाच अशा ५२१ ग्रामपंचायतींपैकी ४९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ ऑगस्ट रोजी पार पडल्या. यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या खामगाव तालुक्यातील ६८ होत्या, तर चिखली तालुक्यातील ५५, बुलडाणा तालुक्यात ४८, देऊळगावराजा २६, सिंदखेडराजा ४१, मेहकर ३४, लोणार १६, मलकापूर ३२, मोताळा ४६, नांदुरा ४३, शेगाव ३४, जळगाव जामोद २३, संग्रामपूर तालुक्यातील २७ अशा ४९३ ग्रामपंचायतींचा समावेश होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकांमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गावागावात असलेले गटातटाचे राजकारण आणि राजकीय प्रतिष्ठा यातून हार-जीतचा एक अध्याय आटोपला. या निवडणूका होऊन तब्बल एक महिना उलटला. या एक महिन्यात सरपंचपदासाठी अनेकांनी गावागावांत फिल्डिंग लावल्या होत्या. सदस्य फोडाफोडीचे राजकारण झाले. अनेकांनी सदस्यांना सहलीवर पाठविले. सोमवारी हे सदस्य सरपंच-उपसरपंच पदासाठी मतदान करण्यास हजर राहतील. यानंतर जिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतीचे कारभारी ठरतील.