शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

बुलडाणा जिल्ह्यातील २0 गावांना पुराचा धोका!

By admin | Updated: June 10, 2016 01:56 IST

८६ संभाव्य पूरग्रस्त गावं; आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन.

बुलडाणा : जिल्हा प्रशासनाने मॉन्सूनपूर्व कामे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पाऊस आणि अतवृष्टीमुळे पुराचा वेढा पडणार्‍या नदीकाठच्या गावासंदर्भातही जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २0 गावं रेड लाईनवर (पूरनियंत्रण रेषा) असल्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. शिवाय ८६ संभाव्य पूरग्रस्त गावं जाहीर केली आहे. पावसाळ्यादरम्यान या गांवामध्ये नागरिकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. आनुषंगिक सूचना संबंधित तहसील कार्यालयास देण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेरून वाहणार्‍या जवळपास १५ नद्यांचा बुलडाणा जिल्ह्याशी संपर्क येतो. दरवर्षी पावसाळ्यात अतवृष्टी झाली, की या नद्यांना पूर येतो. शिवाय नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडून गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटतो. बर्‍याच वेळा पूर आणि अतवृष्टी या परिसरात मनुष्यहानी, पशुहानी आणि आर्थिक नुकसान होते. बर्‍याच वेळा शासकीय दळणवळणाची साधनं पुरात अडकून पडल्यामुळे प्रशासनालाही नुकसान सहन करावे लागते. याबाबत पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि सर्व तहसीलदारांची नुकतीच बैठक घेण्यात आली.